शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुणे महापालिकेचे आयुक्त चिडून म्हणाले, यांना इथे काही करू देऊ नका...!

By श्रीकिशन काळे | Updated: April 24, 2023 19:56 IST

नदीप्रेमींनी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन त्यांना मिळालेले महापालिकेचे पुरस्कार परत करून निषेध व्यक्त केला

पुणे: नदीकाठ सुशोभीकरणामुळे पुणे महापालिका बंडगार्डन येथील हजारो झाडे कापणार आहे. एक तर नदीला नैसर्गिक न ठेवता तिला कॅनॉलचे रूप देण्यात येत आहे आणि दुसरे म्हणजे नदीकाठी असलेली जुनी हजारो झाडे तोडली जाणार आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी आज नदीप्रेमींनी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन त्यांना मिळालेले महापालिकेचे पुरस्कार परत करून निषेध व्यक्त केला.

पुणे महापालिकेच्या वतीने सध्या बंडगार्डन येथे नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम सुरू आहे. तिथे सुशोभीकरण केले जात आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ६ हजार झाडे आणि पुढील टप्प्यात आणखी हजारो झाडे काढली जाणार आहेत. त्यामुळे या वृक्षांना धक्का लावू नये, यासाठी सोमवारी जीवितनदीच्या संस्थापक शैलजा देशपांडे, शाश्वत विकासाचे अभ्यासक प्रा. गुरूदास नूलकर, प्रियदर्शिनी कर्वे,सत्या नटराजन, रणजित गाडगीळ, प्रा. अमिताव मलिक आदी सहभागी झाले होते. या सर्वांना महापालिकेच्या वतीने वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रात कार्य केल्याबद्दल पुरस्कार दिला होता. परंतु, महापालिका आता जे पर्यावरणविरोधी कार्य करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी आपला पुरस्कार महापालिकेत जाऊन परत केला. तेव्हा महापालिका आयुक्त कार्यालयातून बाहेर आले. त्यांनी तेथील सुरक्षारक्षकांना ओरडून सांगितले की, यांना इथे काहीच करू देऊ नका.’’ नदीप्रेमींनी त्यांना भेटायचे आहे असे सांगितले. परंतु, आयुक्तांनी आता भेट होऊ शकत नाही. तुम्ही वेळ घेऊन या, असे चिडून सांगितले. त्यानंतर नदीप्रेमींनी आपले पुरस्कार तिथेच ठेवून महापालिका आयुक्तांचा निषेध व्यक्त केला.

प्रा. नूलकर म्हणाले,‘‘आम्ही महापालिका आयुक्तांना भेटायला गेलो होतो. पण त्यांनी आम्हाला भेट दिली नाही. ते जर आम्हाला इथे काहीच करू नका, असे बोलत असतील, तर आम्ही देखील पुणेकर आहोत. सदाशिव पेठेत राहणारे आहोत. त्यामुळे आम्ही आता मागे हटणार नाही.’’

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाenvironmentपर्यावरणSocialसामाजिकcommissionerआयुक्त