शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:49 IST

मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता

पुणे : पाच वर्षांपूर्वी पतीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर सासू व सुनेमध्ये वादविवाद सुरू झाले. या वादाला कंटाळून ती विधवा सून माहेरी परतली आणि मुले पतीच्या आईकडे म्हणजे आजीकडेच राहिली. मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. परंतु मुलांनी ’आई’ नको ’आजी’ हवी असे सांगितल्याने  मुलांच्या कल्याणाच्या दृष्टीने व त्यांच्या योग्य व निकोप वाढीसाठी त्यांना आजीकडे ठेवणे योग्य होईल असा निर्वाळा कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी दिला.          मात्र, आईला भेटणे हा मुलांचा नैसर्गिक अधिकार आहे म्हणून पंधरा दिवसातून एकदा कौटुंबिक न्यायालयाच्या बाल संकुलामध्ये दोन तासासाठी आईला मुलांना भेटता येणार आहे. तसेच उन्हाळी, हिवाळी व दिवाळीच्या सुट्टीमध्ये आईला मुले आपल्या घरी नेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.         पती आणि पत्नीचा सुखी संसार सुरू असताना पतीचा अनैसर्गिक मृत्यू झाला. त्यामुळे सासू व सूने मध्ये दुरावा निर्माण झाला. दोघांना तीन अज्ञान मुले आहेत. त्यांच्या ताब्याविषयी चा वाद कौटुंबिक न्यायालयात दाखल झाला. सुनेचे म्हणणे होते की ती छोटा व्यवसाय करून पैसा कमावते. त्यामुळे मुलांचा सांभाळ करण्यास समर्थ आहे. सासुच्या म्हणण्यानुसार, ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरी करते. तिने आजपर्यंत मुलांच्या शिक्षणाचा पालनपोषण व औषध उपचाराचा खर्च केलेला आहे.

न्यायालयाने 15 वर्षीय मुलीची साक्ष नोंदविली. त्यामध्ये तिने आजीकडेच राहाण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच इतर दोन मुलांशी समुपदेशकाने संवाद साधला.  त्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या आजीकडे रहायचे आहे. न्यायालयाने मुलांच्या इच्छेचा विचार केला. तसेच आजीने मागील पाच वषार्पासून त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती तसेच आजीने त्यांच्या शिक्षणाची ही योग्य काळजी घेतली होती. मुलांच्या भविष्याचा व कल्याणाचा विचार करून न्यायालयाने मुलांचा ताबा आजीकडे ठेवला.

टॅग्स :Courtन्यायालयmarriageलग्नadvocateवकिलSocialसामाजिक