शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:49 IST

मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता

पुणे : पाच वर्षांपूर्वी पतीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर सासू व सुनेमध्ये वादविवाद सुरू झाले. या वादाला कंटाळून ती विधवा सून माहेरी परतली आणि मुले पतीच्या आईकडे म्हणजे आजीकडेच राहिली. मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. परंतु मुलांनी ’आई’ नको ’आजी’ हवी असे सांगितल्याने  मुलांच्या कल्याणाच्या दृष्टीने व त्यांच्या योग्य व निकोप वाढीसाठी त्यांना आजीकडे ठेवणे योग्य होईल असा निर्वाळा कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी दिला.          मात्र, आईला भेटणे हा मुलांचा नैसर्गिक अधिकार आहे म्हणून पंधरा दिवसातून एकदा कौटुंबिक न्यायालयाच्या बाल संकुलामध्ये दोन तासासाठी आईला मुलांना भेटता येणार आहे. तसेच उन्हाळी, हिवाळी व दिवाळीच्या सुट्टीमध्ये आईला मुले आपल्या घरी नेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.         पती आणि पत्नीचा सुखी संसार सुरू असताना पतीचा अनैसर्गिक मृत्यू झाला. त्यामुळे सासू व सूने मध्ये दुरावा निर्माण झाला. दोघांना तीन अज्ञान मुले आहेत. त्यांच्या ताब्याविषयी चा वाद कौटुंबिक न्यायालयात दाखल झाला. सुनेचे म्हणणे होते की ती छोटा व्यवसाय करून पैसा कमावते. त्यामुळे मुलांचा सांभाळ करण्यास समर्थ आहे. सासुच्या म्हणण्यानुसार, ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरी करते. तिने आजपर्यंत मुलांच्या शिक्षणाचा पालनपोषण व औषध उपचाराचा खर्च केलेला आहे.

न्यायालयाने 15 वर्षीय मुलीची साक्ष नोंदविली. त्यामध्ये तिने आजीकडेच राहाण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच इतर दोन मुलांशी समुपदेशकाने संवाद साधला.  त्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या आजीकडे रहायचे आहे. न्यायालयाने मुलांच्या इच्छेचा विचार केला. तसेच आजीने मागील पाच वषार्पासून त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती तसेच आजीने त्यांच्या शिक्षणाची ही योग्य काळजी घेतली होती. मुलांच्या भविष्याचा व कल्याणाचा विचार करून न्यायालयाने मुलांचा ताबा आजीकडे ठेवला.

टॅग्स :Courtन्यायालयmarriageलग्नadvocateवकिलSocialसामाजिक