शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

केंद्र सरकार सामान्यांच्या खिशातून पैसे उकळतंय; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:55 IST

महाराष्ट्र अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा डाव

पुणे : काहीही करून केंद्र सरकारला महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, त्यांचे सगळे कपटकारस्थान त्यासाठी सुरू आहे, केंद्र सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी वाटेल तसे निर्णय घेताहेत. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या पटोले यांनी त्या कार्यक्रमाआधी पत्रकारांबरोबर संवाद साधला. 

पटोले म्हणाले, केंद्र सरकारला प्रत्येक आघाडीवर अपयश येते आहे. त्याशिवाय सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी वाटेल तसे निर्णय ते घेत आहेत. हे पाप लपवण्यासाठी म्हणून त्यांना सगळीकडे त्यांचीच सत्ता हवी आहे. त्यासाठीच ते महाराष्ट्र अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र महाराष्ट्र याला बळी पडणार नाही.

भाजपाच्या नेेत्यांनी अलीकडेच सन २०१७ ला आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर मान्य करायला हवी होती असे वक्तव्य केले आहे याकडे पटोले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ते कोणाचे नाव घेतात ते त्यांनांच माहिती, त्यावेळी त्यांच्यात काय घटत होते ते आम्हाला कसे समजणार? आम्हाला दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय नाही. आमच्यासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी जे सांगतील तेच महत्वाचे आहे.राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे शत्रू किंवा कायमचे मित्र नसतात असंही पटोले यावेळी म्हणाले आहेत.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा