शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकर मार्ग काढावा- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 18:39 IST

केंद्राला यात बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे आव्हान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिले आहे...

बारामती (पुणे) : मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निवळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र बसून मार्ग काढावा. विशेषत: केंद्र सरकारने यात पुढाकार घ्यावा. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल. सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही यात राजकारण आणणार नाही. पण केंद्राला यात बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे आव्हान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिले आहे.

पवार हे गेल्या तीन दिवसांपासून बारामतीत दुष्काळ दौऱ्यावर आहेत. आजचा तिसरा दिवस आहे. तत्पूर्वी पवार पत्रकारांशी बोलत होते. मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण आंदोलन सुरू आहे, तसेच त्याविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचेही उपोषण सुरू आहे. या उपोषणांसदर्भात यावेळी शरद पवार म्हणाले, जरांगेंनी इतकी उपोषणे केली तरी त्यांचा प्रश्न कुठे सुटला आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. मराठवाड्यात सामाजिक तणाव वाढू नये, याची सर्वांनीच काळजी घ्यावी. दोन्ही समाजांनी शांतता राखावी, सरकारने आरक्षणाचा तिढा सामजस्याने सोडवावा. सामाजिक तणाव वाढू नये, यासाठी आमचे सहकार्य असेल, असेदेखील पवार यांनी नमूद केले.

दुष्काळी भागाला न्याय देणाऱ्या जानाई, पुरंदर उपसा सिंचन या योजना आहेत. या योजनांना माझ्या सहीने मान्यता देऊन फार वर्ष झाली. यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक धोरणात्मक बाबींवर राज्य सरकार निर्णय घेते. या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक बोलवावी, यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र देत विनंती करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. दाैऱ्यात बारामती, इंदापूर, दाैंड, पुरंदरचे प्रश्न समजले. या प्रश्नाबाबतदेखील मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यात येईल. त्यासाठी अनुकूल निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून दूधधंदा महत्त्वाचा आहे. मात्र, त्यासाठी दूध उत्पादन खर्च आणि विक्री किंमत याचा मेळ काही बसत नाही. राज्य शासनाने वाढविलेला ५ रुपये दर काही लोकांना मिळालेला नाही. त्यामुळे ५ रुपये दर वाढवून दूधधंदा परवडेल अशा स्थितीत आणावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे पवार म्हणाले.

भाजप आणि मोदी सरकारबद्दल लोकांच्या मनात असणाऱ्या विश्वासाला तडा बसला. मोदी की गॅरंटी, असे मोदी सतत सांगत. पण त्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास नसल्याचे या लोकसभा निवडणूक निकालात स्पष्ट झाल्याचा टोला पवार यांनी लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा लोकसभेला वाढल्या. त्यामागे मोदींबद्दल नाराजी आहे. असल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणुकीत आम्ही ३१ जागा जिंकल्या, त्यानुसार तर विधानसभेच्या १५५ मतदारसंघात आमच्या लोकांचा विजय झाला होता. आता विधानसभेत लोकांचा मुड दिसेल, असे पवार म्हणाले. राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, एक व्यक्तिगत हल्ले आणि अपघात राज्यात वाढले आहे. राज्य सरकारचं कायदा आणि सुव्यवस्थाबद्दल नियंत्रण हवं ते दिसत नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेmarathaमराठाOBC Reservationओबीसी आरक्षणSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी