शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:12 IST

प्रशासनाला माझी विनंती आहे की, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली, इतर कुणाची होऊ नये म्हणून आरोपींना शिक्षा द्यावी

पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी पुण्यात रविवारी जनआक्रोश मोराचा काढण्यात आला. या मोर्चात लाखो मराठा बांधव, नागरिक सहभागी झाले होते. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, न्याय मिळवण्यासाठी मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी वैभवी देशमुख हिने केली आहे. 

वैभवी म्हणाली, शिवरायांचे विचार जपले असते तर ही हत्या झाली नसती. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’ अशी परिस्थिती झाली आहे. प्रशासनाला माझी विनंती आहे की, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली, इतर कुणाची होऊ नये म्हणून आरोपींना शिक्षा द्यावी. आमची मागणी हीच आहे की, आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी तिने केली आहे. 

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्धवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, विकास पासलकर आदी उपस्थित होते. यावेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनीसुद्धा मोर्चाला उपस्थिती लावली होती.

बजरंंग सोनवणे म्हणाले, बीड आणि परभणीमध्ये अत्यंत खेददायक घटना घडली आहे. त्यामुळे मानवतेला काळीमा फासवणारी आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सरकारला जोपर्यंत या आरोपींना फाशी देण्याची सद्बुद्धी येत नाही, तोपर्यंत मोर्चे सुरूच राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील गुंडशाही एवढी वाढली की जीणं मुश्किल झाले आहे. लोकं रस्त्यावर येण्यास घाबरतात. यामध्ये अनेक आरोपी आहेत, त्यांना सर्वांना सहआरोपी करावे. गुंडशाही आणि झुंडशाही करणाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.

प्रशांत जगताप म्हणाले, मागच्या ३० दिवसांत बीड, परभणी जिल्ह्यात ज्या घटना घडल्या, त्यामुळे महाराष्ट्रातील समाजमन दुखावले आहे, संतोष देशमुख यांनी मराठी बाणा जपला होता. त्यामुळे त्यांना सुरक्षा रक्षकाची मदत केली. याचा राग वाल्मिक कराड आल्यामुळे देशमुखांची हत्या करण्यात आली. या आरोपींना धनंजय मुंडे यांनी वाचवत आहे. हा मोठा आकाचे मंत्रिपद काढून घ्यावे. परंतु आरोपींना शिक्षा देताना मुख्यमंत्री पळवाट काढत आहेत. यावरून त्यांची नियत साफ नाही, असे दिसते.

टॅग्स :PuneपुणेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSuresh Dhasसुरेश धसwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडे