शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:12 IST

प्रशासनाला माझी विनंती आहे की, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली, इतर कुणाची होऊ नये म्हणून आरोपींना शिक्षा द्यावी

पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी पुण्यात रविवारी जनआक्रोश मोराचा काढण्यात आला. या मोर्चात लाखो मराठा बांधव, नागरिक सहभागी झाले होते. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, न्याय मिळवण्यासाठी मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी वैभवी देशमुख हिने केली आहे. 

वैभवी म्हणाली, शिवरायांचे विचार जपले असते तर ही हत्या झाली नसती. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’ अशी परिस्थिती झाली आहे. प्रशासनाला माझी विनंती आहे की, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली, इतर कुणाची होऊ नये म्हणून आरोपींना शिक्षा द्यावी. आमची मागणी हीच आहे की, आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी तिने केली आहे. 

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्धवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, विकास पासलकर आदी उपस्थित होते. यावेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनीसुद्धा मोर्चाला उपस्थिती लावली होती.

बजरंंग सोनवणे म्हणाले, बीड आणि परभणीमध्ये अत्यंत खेददायक घटना घडली आहे. त्यामुळे मानवतेला काळीमा फासवणारी आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सरकारला जोपर्यंत या आरोपींना फाशी देण्याची सद्बुद्धी येत नाही, तोपर्यंत मोर्चे सुरूच राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील गुंडशाही एवढी वाढली की जीणं मुश्किल झाले आहे. लोकं रस्त्यावर येण्यास घाबरतात. यामध्ये अनेक आरोपी आहेत, त्यांना सर्वांना सहआरोपी करावे. गुंडशाही आणि झुंडशाही करणाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.

प्रशांत जगताप म्हणाले, मागच्या ३० दिवसांत बीड, परभणी जिल्ह्यात ज्या घटना घडल्या, त्यामुळे महाराष्ट्रातील समाजमन दुखावले आहे, संतोष देशमुख यांनी मराठी बाणा जपला होता. त्यामुळे त्यांना सुरक्षा रक्षकाची मदत केली. याचा राग वाल्मिक कराड आल्यामुळे देशमुखांची हत्या करण्यात आली. या आरोपींना धनंजय मुंडे यांनी वाचवत आहे. हा मोठा आकाचे मंत्रिपद काढून घ्यावे. परंतु आरोपींना शिक्षा देताना मुख्यमंत्री पळवाट काढत आहेत. यावरून त्यांची नियत साफ नाही, असे दिसते.

टॅग्स :PuneपुणेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSuresh Dhasसुरेश धसwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडे