शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी "थरूर" नामा : ३७० कलमासह, झुंडशाही, हिंदुत्व, अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 08:00 IST

भाजपाकडून महात्मा गांधी व सरदार पटेल यांचे विचार सोयीनुसार हायजॅक केले जात आहेत...

ठळक मुद्देसोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जावू, असा विश्वाससभागृहामध्ये तरूणांची उपस्थिती लक्षणीय

पुणे : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार शशी थरूर यांनी ३७० कलमासह झुंडशाही, हिंदुत्व, हिंदी भाषा अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र सोडले. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही खडे बोल सुनावले. त्यांच्या भाषणाची शैली व आक्रमकता काँग्रेस भवनमधील तरूण कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही भावली. कार्यकर्त्यांसाठी हे भाषण आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जणू चैतन्य देणारे ठरले. काँग्रेस भवनमध्ये रविवारी शशी थरूर यांनी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील तरूण व्यावसायिक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सभागृहामध्ये तरूणांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच राजकारणापासून दुर राहणाऱ्या तरूणांना उद्देशून केली. अनेक व्यावसायिक तरूण राजकारणात आल्यास त्यांचे विचार, नवनवीन कल्पना शासनापर्यंत पोहचू शकतात. त्यासाठी राजकारणात या, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर मात्र त्यांनी केंद्र सरकार व भाजपाच्या नीतीवर चौफेर टीका केली. भाजपाकडून महात्मा गांधी व सरदार पटेल यांचे विचार सोयीनुसार हायजॅक केले जात आहेत. स्वातंत्र्यानंतर पटेलांनाही गांधीवाद हाच खरा राष्ट्रवाद असल्याचे पटले होते. पण भाजपाकडून काही गोष्टी जाणीवपुर्वक लपविल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. काश्मीरमधून हटविण्यात आलेले कलम ३७०, हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात मुस्लिम तरूणांच्या होत असलेल्या हत्या, श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती, हिंदी भाषेबाबत अमित शहा यांची भुमिका अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. हिंदु धर्म व श्रीरामाचाही अपमान करणारे असले हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचे परखड मत यांनी मांडले. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या मताला सकारात्मक प्रतिसाद दिला. भाजपावर टीका करताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही धारेवर धरले. काँग्रेसच्या तत्वांना तिलांजली देणाऱ्या संधीसाधू नेत्यांनी खुशाल जावे. पक्षासोबत राहणारेच महत्वाचे आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक मुद्दा प्रखरपणे मांडत त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याविषयी कसबा ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, थरूर यांचे विचार तरूणाईला नेहमीच आकर्षित करतात. भाषणातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडल्या आहेत. हे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सर्व प्रमुख शहरांमध्ये त्यांची भाषणे व्हायला हवीत. पक्ष संघटनेला दिशा, चैतन्य देणाऱ्या अशा नेत्याची गरज आहे.   ............महात्मा गांधी व पंडित नेहरू यांचे विचारच देशाला तारू शकतात, हे थरूर यांनी पटवून दिले. भाजपाकडून सरदार पटेल आणि काँग्रेसविषयी केली जात असलेली चुकीची मांडणीही त्यांनी खोडून काढली. तरूणांना ही भुमिका पटल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले. त्यांचे भाषण कार्यकर्त्यांना चेतना देणारे ठरले. - रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस----------------शशी थरूर यांचे भाषण कार्यकर्त्यांना दिशा देणारे ठरले. विकासाचे मुद्दे घेऊन भाजपा निवडणुकीला सामोरे जात नाही. भावनिक वातावरण निर्माण केले जात आहे. ३७० कलमाचा निवडणुकीशी संबंध नाही. पण अमित शहा मुंबईत व्याख्यान देतात. त्याला उत्तर देण्याचे काम थरूर यांनी केले आहे. - मोहन जोशी, ज्येष्ठ नेते

टॅग्स :PuneपुणेShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपा