शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी "थरूर" नामा : ३७० कलमासह, झुंडशाही, हिंदुत्व, अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 08:00 IST

भाजपाकडून महात्मा गांधी व सरदार पटेल यांचे विचार सोयीनुसार हायजॅक केले जात आहेत...

ठळक मुद्देसोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जावू, असा विश्वाससभागृहामध्ये तरूणांची उपस्थिती लक्षणीय

पुणे : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार शशी थरूर यांनी ३७० कलमासह झुंडशाही, हिंदुत्व, हिंदी भाषा अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र सोडले. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही खडे बोल सुनावले. त्यांच्या भाषणाची शैली व आक्रमकता काँग्रेस भवनमधील तरूण कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही भावली. कार्यकर्त्यांसाठी हे भाषण आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जणू चैतन्य देणारे ठरले. काँग्रेस भवनमध्ये रविवारी शशी थरूर यांनी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील तरूण व्यावसायिक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सभागृहामध्ये तरूणांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच राजकारणापासून दुर राहणाऱ्या तरूणांना उद्देशून केली. अनेक व्यावसायिक तरूण राजकारणात आल्यास त्यांचे विचार, नवनवीन कल्पना शासनापर्यंत पोहचू शकतात. त्यासाठी राजकारणात या, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर मात्र त्यांनी केंद्र सरकार व भाजपाच्या नीतीवर चौफेर टीका केली. भाजपाकडून महात्मा गांधी व सरदार पटेल यांचे विचार सोयीनुसार हायजॅक केले जात आहेत. स्वातंत्र्यानंतर पटेलांनाही गांधीवाद हाच खरा राष्ट्रवाद असल्याचे पटले होते. पण भाजपाकडून काही गोष्टी जाणीवपुर्वक लपविल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. काश्मीरमधून हटविण्यात आलेले कलम ३७०, हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात मुस्लिम तरूणांच्या होत असलेल्या हत्या, श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती, हिंदी भाषेबाबत अमित शहा यांची भुमिका अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. हिंदु धर्म व श्रीरामाचाही अपमान करणारे असले हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचे परखड मत यांनी मांडले. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या मताला सकारात्मक प्रतिसाद दिला. भाजपावर टीका करताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही धारेवर धरले. काँग्रेसच्या तत्वांना तिलांजली देणाऱ्या संधीसाधू नेत्यांनी खुशाल जावे. पक्षासोबत राहणारेच महत्वाचे आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक मुद्दा प्रखरपणे मांडत त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याविषयी कसबा ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, थरूर यांचे विचार तरूणाईला नेहमीच आकर्षित करतात. भाषणातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडल्या आहेत. हे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सर्व प्रमुख शहरांमध्ये त्यांची भाषणे व्हायला हवीत. पक्ष संघटनेला दिशा, चैतन्य देणाऱ्या अशा नेत्याची गरज आहे.   ............महात्मा गांधी व पंडित नेहरू यांचे विचारच देशाला तारू शकतात, हे थरूर यांनी पटवून दिले. भाजपाकडून सरदार पटेल आणि काँग्रेसविषयी केली जात असलेली चुकीची मांडणीही त्यांनी खोडून काढली. तरूणांना ही भुमिका पटल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले. त्यांचे भाषण कार्यकर्त्यांना चेतना देणारे ठरले. - रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस----------------शशी थरूर यांचे भाषण कार्यकर्त्यांना दिशा देणारे ठरले. विकासाचे मुद्दे घेऊन भाजपा निवडणुकीला सामोरे जात नाही. भावनिक वातावरण निर्माण केले जात आहे. ३७० कलमाचा निवडणुकीशी संबंध नाही. पण अमित शहा मुंबईत व्याख्यान देतात. त्याला उत्तर देण्याचे काम थरूर यांनी केले आहे. - मोहन जोशी, ज्येष्ठ नेते

टॅग्स :PuneपुणेShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपा