शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

विद्यार्थ्यांना टेरेराईस करण्याचा प्रयत्न :प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:58 IST

निवडणूका जवळ आल्याने कॉलेज स्फोटांची केंद्र होवू नये.....

ठळक मुद्देयापुढील काळात मित्र देखील तावून सुलाखून तपासणार भाजपाकडून समाजवादी संघटनांना दडपण्याचा प्रयत्न

पुणे : गेल्या लोकसभा निवणुकांमध्ये विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात रिअ‍ॅक्ट झाला होता. तरुणांचा उठाव झाला तर त्यांना नियंत्रित करणे कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना टेरेराईस करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मत भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच निवडणूका जवळ आल्याने कॉलेज स्फोटांची केंद्र होवू नये, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.      या अघोषित महा-आणीबाणीला विरोधात आम्ही सारे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील आणि बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. विश्वास उटगी आदी यावेळी उपस्थित होते.          अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, तरुणांना बळी करून फॅसिझम येण्याचा मार्ग सोपा करण्यात येत आहे. तरुणांच्या माध्यमातून होणा-या या अंतर्गत स्फोटाला रोखायचे असेल तर आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. तर बाह्य धोके रोखण्याची जबाबदारी सुरक्षा यंत्रणेवर आहे. न्यायमूर्ती सावंत म्हणाले,  भाजपा हा आरएसएसचा राजकीय अवतार आहे. सामाजिक नीतीमुल्ये पायदळी तुडवून देशात व्यापारी मूल्ये स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे लोकशाहीचे रुपांतर धनिकशाहीत होत आहे. पाप बिना लक्ष्मी नही, लक्ष्मी बिना सत्ता नही असे सुत्र आहे. त्यामुळे देशात साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करण्यात येत आहे. आम्ही सत्याग्रही आहोत, हत्याग्रही नाही. हत्येचे विशेष अधिकार इतरांना दिला आहे. धर्मनिरपेक्ष संघटना एकत्र करून दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्यात येणार आहे.       न्यायमुर्ती कोळसे -पाटील म्हणाले, नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्याची क्षमता देशात आहे. मात्र, ही ताकद मूठभर लोकांच्या हाती गेली आहे. निरापराध लोकांना न सोडणारे मोदी, शहा आम्हाला सोडतील असे वाटत नाही. साथ देवू म्हणणारे आमचे काही मित्र आरएसएसला जावून मिळाले. त्यामुळे  यापुढील काळात मित्र देखील तावून सुलाखून तपासणार आहोत. ...................समाजवादी संघटनांना दडपण्याचा प्रयत्न विविध संघटनांना एकत्र घेवून भाजपा आणि आरएसएसला विरोध करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली आहे. भाजपाकडून सामाजवादी संघटनांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्याअर्थी सिंचन घोटाळा खटल्याचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दोन विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करते त्याअर्थी शासनाची प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करत असल्याचे स्पष्ट होते, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

  

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाStudentविद्यार्थी