शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

दहावी-बारावी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसमोरच उघडल्या जाणार, शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:14 IST

राज्य मंडळातर्फे येत्या मार्च-एप्रिलमध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत

राहुल शिंदे

पुणे: इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात व पेपर फुटीच्या घटना घडू नयेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या वर्षापासून प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक पाकीट विद्यार्थ्यांच्या समोर फोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच प्रत्येक पाकिटात केवळ २५ प्रश्नपत्रिकाच असणार होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता कमी होणार आहे, असे राज्य मंडळाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. 

राज्य मंडळातर्फे येत्या मार्च-एप्रिलमध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे यंदा परीक्षा केंद्रांची संख्या तब्बल ३० हजार ९५४ पर्यंत वाढली आहे. मुख्य परीक्षा केंद्रातून उपपरीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिकांची पाकिटे पोहोचवताना ती फोडली जाऊ शकतात. त्यामुळेच गोपनीयतेचा भाग म्हणून राज्य मंडळातून पाठवलेले प्रश्नपत्रिकेचे पाकीट थेट विद्यार्थ्यांसमोरच उघडले जाईल, यांची खबरदारी घेतली आहे.

राज्य मंडळाकडून मुख्य परीक्षा केंद्रावर थ्री लेअर पाकिटात प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. या प्रश्नपत्रिका मुख्य केंद्रातून उपकेंद्रांवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी ४० मिनिटे आधी पोहोचविल्या जातील. पूर्वी प्रश्नपत्रिकेच्या पाकिटात ५० प्रश्नपत्रिका दिल्या जात होत्या. या मुख्य केंद्रावर केंद्र संचालकांच्या उपस्थितीत प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्येनुसार दुसऱ्या पाकिटात भरल्या जात होत्या परंतु आता त्यात बदल करण्यात आला असून एका वर्गात २५ किंवा २५ पेक्षा कमी विद्यार्थी असले तरी प्रत्येक पाकिटात २५ प्रश्नपत्रिका दिलेल्या असतीत. केंद्र संचालक व पर्यवेक्षक हे विद्यार्थ्यांसमोर हे पाकीट उघडतील, असे नियोजन यंदा राज्य मंडळाने केले आहे.

यावर्षी कोरोनामुळे प्रत्येक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रत्येक पाकिटात केवळ २५ प्रश्नपत्रिकाच भरल्या जातील. या प्रश्नपत्रिकेचे पाकीट थेट विद्यार्थ्यासमोर फोडले जाईल.

शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ

केंद्र संचालक, पर्यवेक्षक व विद्यार्थी यांच्यासमोर परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडले जाणार आहे. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यासमोर पाकीट फोडले जाणार असल्याने परीक्षा सुरु होण्यापूर्वी सोशल • मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल होणार नाही.

-महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्र