शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

यवतला तणावपूर्ण शांतता कायम; १५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:39 IST

दौंडचे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात आणि वैशाली नागवडे यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यवत : येथे शुक्रवारी (दि. १) समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता. जमावाने दगडफेक केली, वाहनांना आग लावली आणि काही दुकानांचे नुकसान केले. यानंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली असून, आणखी काही आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना बुधवारपर्यंत (दि. ६) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

एका समाजमाध्यमावरील वादग्रस्त पोस्टमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला. जमाव रस्त्यावर उतरला. दगडफेकीच्या घटनेत एका वाहनाला आग लावण्यात आली, तर काही दुकानांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी यवत पोलिस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावात जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, दौंडचे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात आणि वैशाली नागवडे यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी