शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी घेऊन जाता येईना ; पोलिसांच्या कारवाईची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 21:03 IST

दहावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासण्याची परवानगी शिक्षकांना देण्यात असली तरी त्यांना त्या शाळेतून घरी घेऊन जाताना अनेक अडचणी येत आहेत.

पुणे: राज्य शासनाने शिक्षकांना घरी इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यास परवानगी दिली असली; तरी शाळांमधून या उत्तरपत्रिका घरी आणण्यात शिक्षकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर मार्ग काढावा, अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळातर्फे करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. तसेच इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला. सध्या इयत्ता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका विविध शाळा ,महाविद्यालयांमध्ये मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहेत. शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासणीचे काम करता येऊ शकेल, असा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र सध्या राज्यात संचारबंदी आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. परिणामी शिक्षकांना  शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन उत्तरपत्रिका घेता येत नाही. तसेच मुख्याध्यापक व प्राचार्यांना उत्तरपत्रिका शिक्षकांना देण्यासाठी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी विलंब होण्याची शक्यता मुख्याध्यापक महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे.

इयत्ता बारावीच्या सुमारे 60 टक्के उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहेत. तसेच बहुतांश शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणल्या आहेत. मात्र, इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या तुलनेत दहावीच्या परीक्षा उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे इयत्ता दहावीच्या केवळ 30 टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. शिक्षक घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. उत्तर पत्रिका आणण्यास शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी शासनाने शिक्षकांना मुभा दिली तर उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत होऊ शकते. त्यासाठी राज्य मंडळाने याबाबत शासनाला पत्रव्यवहार करणे अपेक्षित आहे. असे मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजय सिंह गायकवाड यांनी सांगितले.

शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिका आणण्यासाठी जाणार्‍या शिक्षकांना मुख्याध्यापकांना पोलीस यंत्रणेकडून अडविले जात आहे.संचारबंदीनंतरच शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करावे,असे पोलिस प्रशासनाकडून सांगितले जात आहे. राज्य शासनाने शिक्षकांना उत्तरपत्रिका घेऊन जाण्यासाठी परवानगी दिल्याचे कोणतेही पत्र उपलब्ध नाही, असे काही पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे राज्य मंडळाने यामध्ये लक्ष घालावे, यासाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

- विजयसिंह  गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याssc examदहावीTeacherशिक्षक