शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

रोजगार न देऊ शकणाऱ्या पदव्या परत घ्या :  नेट/सेटग्रस्त विद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:29 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आम्ही पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवून, उत्कृष्ट गुणांसह पदव्या संपादित केल्या आहेत. नेट/सेट/पीएच.डी आदी उच्च शिक्षण घेवूनही आम्हाला शिपायांइतकाही पगार मिळत नाही.

ठळक मुद्दे नेट/सेट/पीएचडी संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी कुलगुरूंना निवेदनगावाकडे ‘लई शिकला पण, वाया गेला’ अशी आमची टिंगल

पुणे : आम्ही मोठया कष्टाने आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एमए , एमकॉम, एमएस्सी, पीएचडी, सेट या पदव्या घेतल्या आहेत. मात्र,तरीही आम्हांला नोकऱ्या मिळू शकत नाहीत. उच्चशिक्षण घेऊन अवघ्या ५ ते ६ हजार रूपयांमध्ये आम्हांला राबावे लागत आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या पदव्यांचा भार आम्हांला असह्य झाला आहे, तरी विद्यापीठाने या पदव्या परत घ्याव्यात अशी मागणी नेट/सेट ग्रस्त विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.   नेट/सेट/पीएचडी संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी कुलगुरूंना निवेदन दिले. आमचे पोट भरू न शकणाऱ्या पदव्या परत घ्याव्यात, सुशिक्षित बेरोजगार म्हणून २५ लाख रूपयांचे बिनव्याजी कर्ज द्यावे. (संस्थाचालकांना नोकरीसाठी लाच म्हणून), विद्यापीठाच्या नावाने चहा आणि वडापावचे ठेले लावण्याची परवानगी मिळावी, बेरोजगारांना रुपये २५,०००/- पर्यंत चोरी करण्याचे लायसन्स मिळण्यासाठी कुलगुरूंनी शासनाकडे प्रस्ताव द्यावा, सुशिक्षित बेरोजगार म्हणून हातभट्टी दारूचे गुत्ते चालविण्याचे परवाने मिळवण्यासाठी शासनाकडे कुलगुरूंनी शिफारस करावी आदी मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. संघर्ष समितीचे समन्वयक महावीर साबळे, सुरेश देवडे यांच्यासह अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आम्हीपदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवून, उत्कृष्ट गुणांसह पदव्या संपादित केल्या आहेत. पण या पदव्या प्राप्त परिस्थितीमध्ये कवडीमोल ठरत आहेत. नेट/सेट/पीएच.डी आदी उच्च शिक्षण घेवूनही आम्हाला महाविद्यालयांमध्ये शिपायांइतकाही पगार मिळत नाही. शासनाने जून २०१७ पासून प्राध्यापक भरतीवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.  नोकरी मिळेल या आशेवर आमच्या आयुष्यातली उमेदीची सात-आठ वर्षे निघून गेली. गावाकडे ‘लई शिकला पण, वाया गेला’ अशी आमची टिंगल केली जात आहे. आम्हाला वाटतं आपल्या शिक्षण व्यवस्थेचे हेच सर्वात मोठे अपयश आहे. त्यामुळे आता या पदव्यांचा भार असह्य झाला आहे. या पदव्यांना अनुरूप नसणारी इतर कोणतीही काम करताना आम्हांला या पदव्या आडव्या येतात त्यामुळे या पदव्या विद्यापीठाने परत घ्याव्यात अशी मागणी नेट/सेट/पीएचडी संघर्ष समितीच्यावतीने कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. .........आता जगणं असह्य  नेट/सेट/पीएचडी संघर्ष समितीच्यावतीने सुशिक्षित बेरोजगार म्हणून २५ लाख रूपयांचे बिनव्याजी कर्ज द्यावे. (संस्थाचालकांना नोकरीसाठी लाच म्हणून), विद्यापीठाच्या नावाने चहा आणि वडापावचे ठेले लावण्याची परवानगी मिळावी, बेरोजगारांना रुपये २५,०००/- पर्यंत चोरी करण्याचे लायसन्स मिळण्यासाठी कुलगुरूंनी शासनाकडे प्रस्ताव दयावा, सुशिक्षित बेरोजगार म्हणून हातभट्टी दारूचे गुत्ते चालविण्याचे परवाने देण्याची शिफारस करावी आदी मागण्या केल्या आहेत. उपरोधिक पध्दतीने त्यांनी आपल्या मागण्या मांडून त्यांच्या मनातील असंतोष व्यक्त केला.

टॅग्स :Puneपुणेnitin karmalkarनितीन करमळकरStudentविद्यार्थीeducationशैक्षणिकState Governmentराज्य सरकार