शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय भूमिका विद्यापीठाच्या बाहेर घ्या ; शिक्षणमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 20:44 IST

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका घेऊ नये असा नियम असणारी नियमावली नुकताच पुणे विद्यापीठाने तयार केली आहे. त्यावर शिक्षणमंश्री विनाेद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले.

पुणे : विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका विद्यापीठाच्या कॅपसबाहेर घेण्यास हरकत नाही परंतु विद्यापीठात राजकीय भूमिका नकाे. असा सल्ला शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली तयार केली असून त्यात विद्यार्थ्यांनी कुठलिही राजकीय भूमिका घेऊ नये तसेच सरकार शासनविरोधी कृत्य करू नये असे म्हंटले आहे. तसेच राष्ट्र-विरोधी,समाज व जातीय विरोधी व राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या नियमांच्या विराेधात विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

आज तावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नियमांबद्दल विचारले असता विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका ही विद्यापीठाच्या बाहेर घ्यावी. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी काय म्हणायचे असेल तर त्याची संधी त्यांना असणार आहे. विद्यापीठात कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार हाेता कामा नये. विद्यार्थ्यांना राजकीय भूमिकेशिवाय विद्यार्थ्यांचे नेतृत्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर करता आले पाहिजे. आमच्यावेळी आम्ही जी आंदाेलने केली ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केली. आणि राजकीय आंदाेलने अलका टाॅकीज चाैकात केली. दाेन्हींची गल्लत आम्ही केली नाही. असे ते म्हणाले.

याबाबत बाेलताना एनएसयुआयची रुक्साना पाटील म्हणाली, विद्यापीठाने तयार केलेल्या नियमावलीमध्ये स्पष्टता नाही. नवीन नियम हे बालीश आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, मेस हीच चर्चा करण्याची ठिकाणं असतात. तिथेच जर बाेलण्यावर बंदी घालण्यात येणार असेल तर विद्यार्थ्यांनी आपले म्हणणे मांडायचे कुठे ? हे नियम म्हणजे विद्यार्थ्यांच्या लाेकशाहीवरचा हल्ला आहे. आम्हाला आमच्या अडचणी घेऊन व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवता येत नसेल किंवा आपल्या हक्काची जपणूक करता येत नसेल तर कसले आम्ही संविधानाला अपेक्षित नागरिक बनू ? नियमांमध्ये देशविराेधी कृती करु नये असे म्हणण्यात आले आहे. सरकारविराेधी किंवा व्यवस्थेविरुद्ध बाेलणे हे जर देशविराेधी असेल तर हे लाेकशाही धाेक्यात आल्याचे लक्षण आहे. 

वसतिगृहात राहायचे असेल तर राजकीय भूमिका नकाे ; पुणे विद्यापीठाचा अजब कारभार

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेPuneपुणेPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षण