शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

बैठका बास झाल्या, आता निर्णय घ्या; भाटघर धरणग्रस्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:18 AM

: स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही पदरी निराशाच, मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन

भोर : तालुक्यातील भाटघर धरणाला ९१ वर्षे झाली, तर स्वातंत्र्य मिळूनही ७१ वर्षे झाली. मागील अनेक वर्षांपासून वेळोवेळी आंदोलने, उपोषणे करण्यात आली; मात्र भाटघर धरणग्रस्तांच्या पदरी आश्वासना शिवाय ठोस असे काहीच पडलेले नाही. वारंवार बैठका होतात; मात्र पदरी निराशाच पडत असल्याने आता बास झाल्या बैठका, निर्णय घ्या; अन्यथा धरणग्रस्तच पुढचा निर्णय घेतील, असा इशारा संतप्त भाटघर धरणग्रस्तांनी दिला आहे.

भाटघर धरणग्रस्थांच्या विविध मागण्यांबाबत मंगळवारी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित विभागाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन येत्या १५ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन या बैठकीत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिले. यामुळे धरणग्रस्तांनी आक्रम पावित्रा घेत निर्णय घेण्याची मागणी केली; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

१९२७ मध्ये ब्रिटिशांनी बळाच्या जोरावर वेळवंडी नदीवर भाटघर धरण बांधले. यात ४० गावांतील शेतीच्या ५६७० एकर जमिनी पाण्यात गेल्या तेव्हापासून येथील शेतकरी उत्पन्नाचे साधन पाण्यात गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले.

जमिनीचा मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या माध्यमातून धरणे आंदोलन, साखळी उपोषण, जलसमाधी अशा विविध मार्गांनी आंदोलने सुरु आहेत. त्या वेळी धरणग्रस्तांना तात्पुरती आश्वासने देऊन वेळ मारुन नेली जाते, मात्र धरण भागातील ४० गावांत नागरी सुविधा वगळता कोणतेच ठोस काम झालेले नाही. धरणात गेलेल्या जमिनीला मोबदला मिळावा म्हणून झगडता झगडता एक पिढी मातीआड गेली. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. तसेच शासनाला जागही आली नाही.

धरणाच्या पाण्यामुळे बारामती, फलटण, माळशिरस, पंढरपूरपर्यंत लाखो एकर शेती ओलिताखाली आली. याबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. तर शासनालाही लाखो रुपयांचा महसूल मिळतो. वीर आणि भाटघर धरणे एकाच कालावधीतील असून, वीर धरणग्रतांना पुनर्वसनाचा लाभ मिळतो. मात्र, मागील ९१ वर्षांत भाटघर धरणग्रस्तांनी प्रयत्न करुनही शासनाकडून कोणताच लाभ मिळालेला नाही.

त्यामुळे ९ आॅक्टोबरला वाकांबे गावात साखळी उपोषण व जलसमाधी आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र मंगळवारी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यातआले आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे