शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Nitin Gadkari: सरकारला दूर ठेवून लोकांच्या सहभागातूनच शाश्वत विकास साधता येतो - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:01 IST

चांगल्या सामाजिक कार्यासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते, त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते

पुणे: सामाजिक कार्य हे केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न ठेवता लोकशक्तीच्या जोरावर करणे गरजेचे आहे. सरकारला दूर ठेवून लोकांच्या सहभागातूनच शाश्वत विकास साधता येतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नाम फाउंडेशनचा रविवारी (दि. १४) दशकपूर्ती समारंभ स्वारगेट येथील गणेश कला मंच येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी आत्महत्या, दुष्काळग्रस्त भागातील पुनरुत्थान, पर्यावरण संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा यांसारख्या विविध उपक्रमांतून फाउंडेशनने गेल्या दहा वर्षांत ग्रामीण भागात केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार भीमराव तापकीर, ‘नाम’चे संस्थापक-अध्यक्ष अभिनेता नाना पाटेकर, संस्थापक-सचिव मकरंद अनासपुरे उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, चांगल्या सामाजिक कार्यासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते. त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते. ‘नाम’ने केलेले कार्य महत्त्वाचे असून ‘देणारे हात होण्यापेक्षा मदत करणारे हात होता आलं पाहिजे. जेवढ्या जास्त प्रमाणात आपण कौशल्य निर्माण करू तेवढे आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहू. त्यासाठी समाजासाठी संवेदनशील काम करणे गरजेचे आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला वर्गासाठी ५ तासांचे काम वर्क मॉड्युल राबवणे गरजेचे आहे. यातून अधिकाधिक महिलांसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. सप्टेंबर २०१५ साली ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना झाली आणि त्याची दशकपूर्ती होत आहे. या वाटचालीत आजवर असंख्य हातांनी माणुसकीच्या या यज्ञात मोठे योगदान दिले. मानवतेचा हा यज्ञ यापुढेही असाच अखंडपणे चालत राहील, यासाठी ‘नाम फाउंडेशन’ कटिबद्ध असल्याचे ‘नाम’चे संस्थापक-अध्यक्ष नाना पाटेकर आणि संस्थापक-सचिव मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गNana Patekarनाना पाटेकरMakrand Anaspureमकरंद अनासपुरेCentral Governmentकेंद्र सरकार