शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

सूर छेडिले, नदीकाठी, नदीसाठी; संगीतमय कार्यक्रमातून ‘नदी वाचवा’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 03:49 IST

भारूडे, गीते, काव्याने दुमदुमला परिसर

पुणे : नदी किनारी छान गाणी, कविता, गझल, कथा ऐकताना सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटात, सूर्यकिरणांच्या कोवळ्या प्रकाशझोतात, पालापाचोळ्याच्या सान्निध्यात, वृक्षराजीच्या सावलीत पुणेकर रंगून गेले. नदी विषयाच्या आपुलकीच्या जाणिवा या मैफलीने अजून गडद केल्या. लहानथोरापासून सर्वांनी येथे नदी संवर्धनाचा ध्यास मनी रूजवला. संगीताच्या लहरीने येथील परिसर दुमदुमून गेला. नदी संवर्धनासाठी पहिल्यांदाच एक अनोखा संगीतमय कार्यक्रम नदीकाठी नदीसाठी जीवितनदी संस्थेकडून आयोजित करण्यात आला होता.संथ वाहते कृष्णामाई, सांज ये गोकुळी सावळी सावळी, माझे जीवनगाणे, सिखो ना नैनो की भाषा, ओ नदी आ नदी ओ नदी नदीया आदी गाणी सादर झाली. हा मैफलीचा कार्यक्रम चंद्रकांत निगडे, अमेय वरदे, ओमकार खाडीलकर, संबोधी सोनवणे, हृषीकेश डोईफोडे, मैथिली डोईफोडे, मोहित, शुभा कुलकर्णी, मृणाल वैद्य, सागर कुलकर्णी, चंदूलाल तांबोळी यांनी सादर केला. शैलजा देशपांडे यांनी सर्वांची ओळख करून दिली. हा कार्यक्रम औंध येथील राम नदी आणि मुळा नदीच्या संगमाजवळ घेण्यात आला.नदी म्हणजे फक्त वाहणारे पाणी नव्हे. तिच्यापलीकडे जाऊन तिला समजून घेतले पाहिजे. ‘झाले गेले गंगेला मिळाले’, अशी एक म्हण आहे. आपणच आपल्या गोष्टीची विल्हेवाट लावावी. तिच्यात सर्व आपण घाण, कचरा टाकतो. खरं तर आपलं नातं नदीशी राहिलेले नाही. तिचं आणि आपलं नातंच फुललेले नाही. त्यामुळे तिच्याबद्दल नागरिकांमध्ये प्रेम राहिलेले नाही. मंगेश पाडगावकर यांचे ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ हे गीत सादर झाले आणि मातीशी काय नातं असते ते उलगडलं. नदी तृष्णा तृप्तीचे कार्य करीत आली आहे. पण आता तिच्या जागी धरणे आली आहेत. या धरणांमुळेच आपण पाणी पितो, असेच अनेकांना वाटते, अशी आजची विचार करण्याची पद्धत उलगडली.‘विंचू चावला’तून नदी स्वच्छतेचा संदेशअगंगं विंचू चावला हे विडंबनात्मक काव्य सादर केले. नदीला जणू काही विषारी केमिकलचा विंचू चावला आहे. त्यामुळे तिची अवस्था दयनीय झाली आहे. मलवाहिनी दररोज नदीला नांगी मारत आहे. दररोज त्यातून किती तरी केमिकल नदीत जात आहे. परिणामी नदी नाल्यासारखी विपन्नावस्थेत आहे. यावर एकच उतारा आहे. घरातून जाणारे केमिकल बंद करणे. नैसर्गिक जीवनशैली अंगीकारणे. त्यातूनच घरबसल्या नदी स्वच्छ होऊ शकते, असा संदेश या ‘विंचू चावला’ काव्यातून देण्यात आला.शैलजा देशपांडे म्हणाल्या, आपली फुफ्फुसे आपणच संरक्षित करणे आवश्यक आहे. जंगल हे आहे तसे ठेवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विकासासाठी या जंगलाचे नुकसान नकोय. भ्रामक विकासाच्या कल्पनेमागे न जाता शाश्वत विकासाकडे जायला हवे.नदीत दूषित पाण्याचा थेंब नकोनदी संवर्धनाचे काम करणारे कार्यकर्ते अनिल गायकवाड म्हणाले, ‘‘सध्या महापालिकेत विकासासाठी कोटीच्या कोटी उड्डाणांचे नियोजन करण्यात येते. तेव्हा नदीकडेही थोडेसे पाहिले पाहिजे. शंभर वर्षापूर्वीची नदी हवी आहे. पूर्वी कुठलेही त्यात बांधकाम नव्हते. राम नदीमध्ये दहा किलोमीटरचा भाग पालिका हद्दीत येतो. त्यात कुठलाही दूषित पाण्याचा थेंब जाऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधीने प्रयत्न केले पाहिजे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणriverनदी