शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सिंहगडाचा अवघड पश्चिमकडा सर करुन ३५० युवकांची तान्हाजींना अनोखी मानवंदना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 21:48 IST

हर..हर..महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत सिंहगडाचा अवघड पश्चिमकडा सर..

ठळक मुद्दे३५० व्या पुण्यतिथीनिमित्त इतिहास प्रेमी मंडळाचा पुढाकारमावळ्यांच्या वेशात कडा सर करून दैदिप्यमान युद्धाच्या आठवणींना दिला उजाळा

पुणे :  हर..हर..महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत जवळपास ३५० तरूण युवकांनी सिंहगडाचा अवघड पश्चिमकडा सर करून तान्हाजी मालुसरे यांना अभिवादन करत अनोखी मानवंदना दिली. निमित्त होते तान्हाजी मालुसरे यांच्या ३५० पुण्यतिथीचे. मुलांनी मावळ्यांच्या वेशात कडा सर करून दैदिप्यमान युद्धाच्या आठवणींना ऊजाळा दिला. रणांगणावर रक्त सांडले, रणी धुरंदर वीर स्मरा... दुर्गम गड गाजविला रात्री, नरवीर केसरी घ्या मुजरा... अशा काव्यपक्तींमधून आणि जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात ३५० युवक-युवतींनी  उत्साह दाखवत पुन्हा एकदा सिंहगडावर चढाई केली.  मराठा इतिहासातील एक देदिप्यमान पर्व असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांनी गाजविलेल्या पराक्रमाला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रत्यक्ष गडावर जाऊन आगळीवेगळी मानवंदना दिली.  सुमारे ४० फुटी कडा दोराच्या सहाय्याने सर करत मराठयांच्या शौर्याचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवला. इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त आणि सिंहगड सर केल्याच्या घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या अनोख्या मानवंदना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी गडावर झालेल्या कार्यक्रमाला सर्जिकल स्ट्राईकचे रणनीतीकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.   राजेंद्र निंभोरकर म्हणाले, तानाजी मालुसरे यांनी गडावर केलेल्या चढाईप्रमाणे लष्करातर्फे देखील शत्रूवर चढाई केली जाते आणि ९० टक्के यश यामध्ये असते, असा अनुभव आहे. आपण इतिहास विसरलो, तर भूगोल निश्चित रहात नाही. पूर्वजांनी गाजविलेला इतिहास आपल्याला माहिती हवा, त्यातून तरुणांना प्रोत्साहन मिळेल.  पांडुरंग बलकवडे म्हणाले, ज्या देशातील व्यक्ती स्वत:च्या घरातील कार्य सोडून देशासाठी बाहेर पडतो, तो देश नक्कीच पुढे जातो. आपला संघर्ष राष्ट्रासाठी आहे, देशभक्तीचा विचार पुढे गेला पाहिजे, ही भावना शिवरायांनी मावळ्यांमध्ये रुजविली. राष्ट्रभक्ती सोबतच संस्कृतीभक्ती व समाजभक्ती देखील त्यांनी रुजविली.  ..................ज्याप्रमाणे तानाजी मालुसरेंनी ३५० वर्षांपूर्वी हा किल्ला ताब्यात घेतला. त्या कडयावरुन आम्ही दोरावर गाठी बांधून आलो, तरी अवघड गेले. त्याकाळी त्यांनी कसे युद्ध केले असेल, याची कल्पना आपण करु शकत नाही. मावळी पोशाखात आम्ही सहभागी झालो होतो, त्यामुळे आम्ही शिवकाल पुन्हा एकदा अनुभवला. - सौरभ जगताप, सहभागी युवक.........नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ला जिंकून घेण्याच्या पराक्रमाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. सिंहगडासारखा बळकट दुर्ग आणि उदयभानू सारखा कडवा मोगल किल्लेदार असताना गड जिंकणे सोपे नव्हते़ पण अतुलनीय धाडस, गनिमी कावा तंत्राचा अचूक वापर, स्वराज्यावरील अभंग निष्ठा, गडाचा सर्वांगिण अभ्यास या गुणांमुळे मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला. ती रात्र होती १६७० सालच्या माघ वद्य नवमीची. त्यामुळे त्यांच्या शौर्याला आम्ही केवळ पूजा, आरती व घोषणांनी नव्हे, तर प्रत्यक्ष तो अनुभव घेऊन मानवंदना दिली. - मोहन शेटे,  अध्यक्ष, इतिहास प्रेमी मंडळ. ..................

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाTanaji Movieतानाजी