शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेशीमगाठींमधून जपलाय संतांचा चिरंजीवी वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 19:09 IST

महाराष्ट्राला समृध्द संतपरंपरा लाभली आहे. विविध काव्यप्रकारांमधून संतांनी समाजप्रबोधनाचे संचित बहाल केले. हेच संचित सुनिता आचार्य या ५७ वर्षीय आजींनी रेशीम धाग्यांमधून चिरंजीव ठेवण्याचा प्रयत्न केला आहे

पुणे : महाराष्ट्राला समृध्द संतपरंपरा लाभली आहे. विविध काव्यप्रकारांमधून संतांनी समाजप्रबोधनाचे संचित बहाल केले. हेच संचित सुनिता आचार्य या ५७ वर्षीय आजींनी रेशीम धाग्यांमधून चिरंजीव ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पांढ-या कापडावर रेशमाच्या धाग्यांनी त्यांनी स्तोत्रे, ओव्या लिहून ठेवण्याचा छंद आपलासा केला आहे.सुनिता आचार्य यांना लहानपणापासून संताच्या कार्याबद्दल नितांत आदर आणि देवाबद्दल कमालीची श्रध्दा आहे. संतांचा वारसा, त्यांची शब्दसंपदा लिखित स्वरुपात संवर्धित व्हावी, अशी त्यांनी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. २००९ सालापासून ही इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याचे त्यांनी ठरवले. पाच कडव्यांच्या गुरुस्तोत्रापासून रेशमाच्या धाग्याने कापडावर स्तोत्र विणण्याचा संकल्प त्यांनी सोडला. सुरुवातीला पांढ-या कापडावर चारही बाजूंनी समान जागा सोडून, खडूने अक्षरे रेखाटून घेतली जातात. अक्षरांचा आकार, ठेवण समान आल्याची खात्री झाल्यावर मार्करने ती अक्षरे गिरवून त्यावर रेशीम धाग्यांची त्या वीण घालतात. सुरुवातीला आचार्य यांनी वेदिका मिराशी यांच्याकडून त्यांनी स्तोत्रातील अक्षरे लिहून घेतली. तुकाराम गाथेतले अभंगही गिरवून घेतले. कालांतराने मैत्रिणीला हे काम जमेनासे झाले. आता काय करायचे, असा प्रश्न त्यांना सतावर होता. त्यावेळी आचार्य यांच्या वडिलांनी सखाराम फरकाळे यांच्याशी ओळख करुन दिली. फरकाळे यांच्याकडून त्या अक्षरे लिहून, गिरवून घेतात आणि त्याच्यावर कोणत्या रंगाचे धागे शोभून दिसतील, त्याचा अंदाज घेऊन वीण घालायला सुरुवात करतात.सुनिता आचार्य यांनी आजपर्यंत आंबेजोगाईच्या दासोपंतांची पासोडी, गुलाब महाराज यांचा मोक्षपट, श्री गजानन स्तोत्र, संत रामदासांचे दासबोध, विष्णूसहस्त्रनाम आदी स्तोत्रे रेशीम धाग्यांचा वापर करुन पांढ-या बेडशीटवर विणली आहेत. सुशोभीकरणासाठी छोट्या छोट्या वस्तू कामी येतात. सध्या त्या भगवदगीतेचे अध्याय विणण्याचे काम करत आहेत. पहिल्या अध्यायातील तेराव्या ओवीपर्यंत काम झाले असून, संपूर्ण भगवदगीता पूर्ण करण्यासाठी दोन-अडीच वर्षे लागतील, असे सुनिता आचार्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुनिता ज्ञानेश्वरीतील सर्व ओव्या विणण्याचे कामही हाती घेणार आहेत. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, ही टिळकांची सिंहगर्जना कापडावर विणून त्यांनी लोकमान्य टिळक संग्रहालयाला भेट दिली आहे. त्यांना या कामात त्यांची आई मालती आचार्य मदत करतात. माझी आणि आईची ग्रंथांवर श्रध्दा आहेच; मात्र, संतांबद्दल जास्त आपुलकी आहे, अशा भावना व्यक्त केल्या. पाणी पडले तरी ही वीण खराब होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

सुनिता  आचार्य   : रेशमाच्या धाग्यांनी स्तोत्रे कापडावर विणण्यास खूप वेळ लागतो, असे काही जण म्हणतात. आपण टिंगलटवाळी करण्यात, चित्रपट पाहण्यात कितीतरी वेळ वाया घालवतो. संतांनी दिलेला वारसा टिकवून ठेवण्यात वेळ सत्कारणी लावण्यात मला समाधान मिळते. पुढील पिढ्यांसाठी हा वारसा चिरंजीवी ठरणार आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकाराम