शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

रेशीमगाठींमधून जपलाय संतांचा चिरंजीवी वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 19:09 IST

महाराष्ट्राला समृध्द संतपरंपरा लाभली आहे. विविध काव्यप्रकारांमधून संतांनी समाजप्रबोधनाचे संचित बहाल केले. हेच संचित सुनिता आचार्य या ५७ वर्षीय आजींनी रेशीम धाग्यांमधून चिरंजीव ठेवण्याचा प्रयत्न केला आहे

पुणे : महाराष्ट्राला समृध्द संतपरंपरा लाभली आहे. विविध काव्यप्रकारांमधून संतांनी समाजप्रबोधनाचे संचित बहाल केले. हेच संचित सुनिता आचार्य या ५७ वर्षीय आजींनी रेशीम धाग्यांमधून चिरंजीव ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पांढ-या कापडावर रेशमाच्या धाग्यांनी त्यांनी स्तोत्रे, ओव्या लिहून ठेवण्याचा छंद आपलासा केला आहे.सुनिता आचार्य यांना लहानपणापासून संताच्या कार्याबद्दल नितांत आदर आणि देवाबद्दल कमालीची श्रध्दा आहे. संतांचा वारसा, त्यांची शब्दसंपदा लिखित स्वरुपात संवर्धित व्हावी, अशी त्यांनी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. २००९ सालापासून ही इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याचे त्यांनी ठरवले. पाच कडव्यांच्या गुरुस्तोत्रापासून रेशमाच्या धाग्याने कापडावर स्तोत्र विणण्याचा संकल्प त्यांनी सोडला. सुरुवातीला पांढ-या कापडावर चारही बाजूंनी समान जागा सोडून, खडूने अक्षरे रेखाटून घेतली जातात. अक्षरांचा आकार, ठेवण समान आल्याची खात्री झाल्यावर मार्करने ती अक्षरे गिरवून त्यावर रेशीम धाग्यांची त्या वीण घालतात. सुरुवातीला आचार्य यांनी वेदिका मिराशी यांच्याकडून त्यांनी स्तोत्रातील अक्षरे लिहून घेतली. तुकाराम गाथेतले अभंगही गिरवून घेतले. कालांतराने मैत्रिणीला हे काम जमेनासे झाले. आता काय करायचे, असा प्रश्न त्यांना सतावर होता. त्यावेळी आचार्य यांच्या वडिलांनी सखाराम फरकाळे यांच्याशी ओळख करुन दिली. फरकाळे यांच्याकडून त्या अक्षरे लिहून, गिरवून घेतात आणि त्याच्यावर कोणत्या रंगाचे धागे शोभून दिसतील, त्याचा अंदाज घेऊन वीण घालायला सुरुवात करतात.सुनिता आचार्य यांनी आजपर्यंत आंबेजोगाईच्या दासोपंतांची पासोडी, गुलाब महाराज यांचा मोक्षपट, श्री गजानन स्तोत्र, संत रामदासांचे दासबोध, विष्णूसहस्त्रनाम आदी स्तोत्रे रेशीम धाग्यांचा वापर करुन पांढ-या बेडशीटवर विणली आहेत. सुशोभीकरणासाठी छोट्या छोट्या वस्तू कामी येतात. सध्या त्या भगवदगीतेचे अध्याय विणण्याचे काम करत आहेत. पहिल्या अध्यायातील तेराव्या ओवीपर्यंत काम झाले असून, संपूर्ण भगवदगीता पूर्ण करण्यासाठी दोन-अडीच वर्षे लागतील, असे सुनिता आचार्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुनिता ज्ञानेश्वरीतील सर्व ओव्या विणण्याचे कामही हाती घेणार आहेत. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, ही टिळकांची सिंहगर्जना कापडावर विणून त्यांनी लोकमान्य टिळक संग्रहालयाला भेट दिली आहे. त्यांना या कामात त्यांची आई मालती आचार्य मदत करतात. माझी आणि आईची ग्रंथांवर श्रध्दा आहेच; मात्र, संतांबद्दल जास्त आपुलकी आहे, अशा भावना व्यक्त केल्या. पाणी पडले तरी ही वीण खराब होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

सुनिता  आचार्य   : रेशमाच्या धाग्यांनी स्तोत्रे कापडावर विणण्यास खूप वेळ लागतो, असे काही जण म्हणतात. आपण टिंगलटवाळी करण्यात, चित्रपट पाहण्यात कितीतरी वेळ वाया घालवतो. संतांनी दिलेला वारसा टिकवून ठेवण्यात वेळ सत्कारणी लावण्यात मला समाधान मिळते. पुढील पिढ्यांसाठी हा वारसा चिरंजीवी ठरणार आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकाराम