शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या दरात घसरण सुरूच

By admin | Updated: February 28, 2015 23:38 IST

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाची घोषणा झाल्यानंतरही साखर उद्योग क्षेत्रावरील मळभ दूर होण्याची चिन्हे नाहीत.

पुणे : कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाची घोषणा झाल्यानंतरही साखर उद्योग क्षेत्रावरील मळभ दूर होण्याची चिन्हे नाहीत. साखरेच्या दरात घसरण सुरूच असून शुक्रवारी कारखान्यातील साखरेचा दर (कर वगळता) प्रतिक्विंटल २,३१० ते २,३५० रुपयांपर्यंत खाली आला. अनुदानाची घोषणा झाली तेव्हा साखरेचा दर २,४०० ते २,४५० रुपये होता. मागील आठवड्यात कच्च्या साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकारने प्रतिटन ४,००० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही घोषणा अद्याप कागदावरच आहे. त्याबाबत अधिसूचना जारी न झाल्यामुळे साखर कारखानदारांनी कच्च्या साखरेचे उत्पादन सुरू केलेले नाही. दरम्यान, साखरेचे दर मागील ९ महिन्यांत तब्बल ७०० रुपयांनी घटले आहेत. मागील आठवड्यात कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाची घोषणा झाल्यानंतरही एनसीडीएक्स वायदे बाजारात घसरण सुरूच आहे. वायदे बाजारातील दर क्विंटलमागे १४२ रुपये कमी होऊन तो २,५५८ रुपयांवर आला आहे. मागील आठवड्यात हा दर २,७०० रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेच्या दरामध्येही लक्षणीय घसरण झाली. मागील आठवड्यात प्रतिक्विंटल २,०४० रुपये असलेला हा दर आता १,८९० रुपयांपर्यंत खाली आला आहे.‘‘देशातील अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक वितरणासाठी खासगी पुरवठादारांमार्फत साखर खरेदी केली जाते. ही खरेदी बाजारदरापेक्षा जास्त किमतीने होते. आधी राज्य सरकारसोबत साखर विक्रीचे करार करायचे आणि नंतर कारखान्यांकडून कमी दरात खरेदी करायची, असे सत्र सध्या सुरू आहे. यामुळे खासगी पुरवठादारांचे उखळ पांढरे होत आहे. देशातील साखर उद्योग संकटात येण्यामागे हेही एक महत्वाचे कारण आहे. अतिरिक्त साखरेचा बफर स्टॉक निर्माण केल्यास किंवा देशातील सार्वजनिक वितरणासाठी वार्षिक २७ लाख टन साखर सरकारने थेट कारखान्यांकडून खरेदी केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो, असे मत अभ्यासक योगेश पांडे यांनी व्यक्त केले.४साखरेच्या दरातील घसरण न थांबल्यास कारखाने आणखी संकटात येण्याची दाट शक्यता आहे. कारखान्यांनी साखरेचे उत्पादन केल्यावर त्याच्या किमतीच्या आधारे बँका कारखान्यांना आगाऊ कर्ज देतात. या रकमेच्या आधारे कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाची किंमत आदा केली जाते. साखरेचे दर आणखी कमी झाल्यास, महिनाअखेर होणाऱ्या फेरआढाव्यात कर्जाचे पुनर्मुल्यांकन होईल आणि त्यातील फरक कारखान्यांकडून वसूल केला जाईल. आधीच संकटात असलेले कारखाने यामुळे अधिक संकटात येतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.