शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Success Story: विशीत संसार तुटला, आयुष्यात हार न मानता दिल्ली गाठली अन् मंजरी IPS झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:18 IST

मंजरी जरुहर यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या यशोगाथेवर 'जय गंगाजल' नावाचा बॉलीवूड चित्रपट आहे....

IPS Manjari Jaruhar Success Story: कमी वयात झालेले लग्न अन् काही दिवसांत नात्यात जर दुरावा आला तर कुठलाही माणूस खचतो. त्याला त्याच्या आयुष्यातील रस निघून गेल्याची जाणीव होते. खूपच कमी लोक लहान वयातील संकटावर मात करत आयुष्यात यशस्वी होतात. त्यामध्येच मंजरी जरुहर यांचे नाव घेतले जाते. ज्यांनी अनेक अडचणींचा सामना करूनही इतिहास रचला. मंजरी यांचे जीवन मोठ्या चढ-उतारांनी भरलेले आहे. त्यांची ही कहाणी देशातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरली. अनेक संकटांवर मात करत मंजरी जरुहर या बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी झाल्या.

मंजरी जरुहर यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या यशोगाथेवर 'जय गंगाजल' नावाचा बॉलीवूड चित्रपट आहे. जरुहर या बिहारच्या पहिल्या महिला IPS आहेत. तसेच देशातील पहिल्या पाच महिला IPS अधिकाऱ्यांच्या यादीत देखील समाविष्ट आहेत. पण, त्यांना इथपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नव्हतं. सुशिक्षित कुटुंबातील असूनही वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. मात्र, काही दिवसांतच हे नातेही तुटले. तरीही त्यांनी हार न मानता दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली आणि त्यांनी आयपीएसची पोस्ट मिळवली.

'ठरवून यश मिळवलं'-

वैवाहिक जीवनातील अपयशानंतर मंजरी खचल्या. पण त्यावर त्यांनी मात करत स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रेरित करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे आयएएस अधिकारी IAS) होण्याचे स्वप्न होते. नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी यासाठी मंजरी जरुहर दिल्लीला गेल्या. त्यानंतर, तेथील कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि युपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली. रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मंजरी यांना मेहनतीचे फळ मिळाले. त्या १९७६ मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या.

दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त-

मंजरी जरुहर यांनी १९७४ मध्ये पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली, ज्यामध्ये त्या मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या होत्या. पण त्यावेळी त्यांना परीक्षेच्या या अखेरच्या टप्प्यावर अपयश आले. यानंतर हार न मानता पुन्हा त्यांनी पहिल्यापासून तयारी सुरू केली. युपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. यंदा मात्र त्यांनी मुलाखतीची चांगली तयारी केल होती. त्यामुळे परीक्षेच्या या अखेरच्या टप्प्यात यश प्राप्त केले आणि १९७५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात UPSC ची परीक्षेत यश मिळवले. जहरूर यांना लहानपणापासूनच घरच्या कामात लक्ष देण्यास सांगितले जात होते. तसेच कुशल गृहिणी बनण्याचा सल्लाही वारंवर देण्यात येत होता. पण कमी वयात आलेल्या संकटांवर मात करत त्या युपीएससीची परीक्षा पास झाल्या आणि देशभरातील मुलींसाठी प्रेरणास्थान झाल्या.

दिल्ली विद्यापीठातून घेतले पदव्युत्तर शिक्षण-

IPS मंजरी जारुहर यांनी पाटणा महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या उद्देशाने दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अभ्यास करत दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच, नागरी सेवांच्या तयारीसाठी त्यांनी कोचिंगमध्ये प्रवेश घेतला आणि अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

टॅग्स :Puneपुणेupscकेंद्रीय लोकसेवा आयोगBiharबिहारdelhiदिल्लीbollywoodबॉलिवूड