शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Success Story: विशीत संसार तुटला, आयुष्यात हार न मानता दिल्ली गाठली अन् मंजरी IPS झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:18 IST

मंजरी जरुहर यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या यशोगाथेवर 'जय गंगाजल' नावाचा बॉलीवूड चित्रपट आहे....

IPS Manjari Jaruhar Success Story: कमी वयात झालेले लग्न अन् काही दिवसांत नात्यात जर दुरावा आला तर कुठलाही माणूस खचतो. त्याला त्याच्या आयुष्यातील रस निघून गेल्याची जाणीव होते. खूपच कमी लोक लहान वयातील संकटावर मात करत आयुष्यात यशस्वी होतात. त्यामध्येच मंजरी जरुहर यांचे नाव घेतले जाते. ज्यांनी अनेक अडचणींचा सामना करूनही इतिहास रचला. मंजरी यांचे जीवन मोठ्या चढ-उतारांनी भरलेले आहे. त्यांची ही कहाणी देशातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरली. अनेक संकटांवर मात करत मंजरी जरुहर या बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी झाल्या.

मंजरी जरुहर यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या यशोगाथेवर 'जय गंगाजल' नावाचा बॉलीवूड चित्रपट आहे. जरुहर या बिहारच्या पहिल्या महिला IPS आहेत. तसेच देशातील पहिल्या पाच महिला IPS अधिकाऱ्यांच्या यादीत देखील समाविष्ट आहेत. पण, त्यांना इथपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नव्हतं. सुशिक्षित कुटुंबातील असूनही वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. मात्र, काही दिवसांतच हे नातेही तुटले. तरीही त्यांनी हार न मानता दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली आणि त्यांनी आयपीएसची पोस्ट मिळवली.

'ठरवून यश मिळवलं'-

वैवाहिक जीवनातील अपयशानंतर मंजरी खचल्या. पण त्यावर त्यांनी मात करत स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रेरित करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे आयएएस अधिकारी IAS) होण्याचे स्वप्न होते. नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी यासाठी मंजरी जरुहर दिल्लीला गेल्या. त्यानंतर, तेथील कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि युपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली. रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मंजरी यांना मेहनतीचे फळ मिळाले. त्या १९७६ मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या.

दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त-

मंजरी जरुहर यांनी १९७४ मध्ये पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली, ज्यामध्ये त्या मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या होत्या. पण त्यावेळी त्यांना परीक्षेच्या या अखेरच्या टप्प्यावर अपयश आले. यानंतर हार न मानता पुन्हा त्यांनी पहिल्यापासून तयारी सुरू केली. युपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. यंदा मात्र त्यांनी मुलाखतीची चांगली तयारी केल होती. त्यामुळे परीक्षेच्या या अखेरच्या टप्प्यात यश प्राप्त केले आणि १९७५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात UPSC ची परीक्षेत यश मिळवले. जहरूर यांना लहानपणापासूनच घरच्या कामात लक्ष देण्यास सांगितले जात होते. तसेच कुशल गृहिणी बनण्याचा सल्लाही वारंवर देण्यात येत होता. पण कमी वयात आलेल्या संकटांवर मात करत त्या युपीएससीची परीक्षा पास झाल्या आणि देशभरातील मुलींसाठी प्रेरणास्थान झाल्या.

दिल्ली विद्यापीठातून घेतले पदव्युत्तर शिक्षण-

IPS मंजरी जारुहर यांनी पाटणा महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या उद्देशाने दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अभ्यास करत दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच, नागरी सेवांच्या तयारीसाठी त्यांनी कोचिंगमध्ये प्रवेश घेतला आणि अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

टॅग्स :Puneपुणेupscकेंद्रीय लोकसेवा आयोगBiharबिहारdelhiदिल्लीbollywoodबॉलिवूड