शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Pune Police: गुंडांना राेखण्यात यश; पण वाहतूक कोंडी फाेडण्यात अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:51 IST

शहरातील वाहतूक कोंडी हे माझं अपयश आहे, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली....

पुणे : शहरात गुन्हेगारी वाढली होती. जमिनी बळकावणे, कारागृहाबाहेर मिरवणुका काढणे, तलवारीने केक कापल्याचे व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवणे असे प्रकार वाढले होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी टोळ्यांसह गुंडांवर मोक्का लावण्यास सुरुवात केली. या कारवाईची गुंडांमध्ये इतकी दहशत बसली की, सध्या चुकीचा व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवण्याचीही कुणाची हिंमत हाेत नाही, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अभिमानाने सांगितले. त्याचबराेबर शहरातील वाहतूक कोंडी हे माझं अपयश आहे, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

पोलीस आरोग्य मित्र फाउंडेशनच्या वतीने ‘शतक मोक्काचे, कौतुक पोलिसांचे’ या कार्यक्रमांतर्गत अमिताभ गुप्ता यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी आयुक्तांना विविध विषयांवर बोलते केले. ‘वाहतूक कोंडीच्या वेळी रस्त्यांवर पोलीस का दिसत नाहीत?’ असा सवाल गाडगीळ यांनी विचारला असता पोलीस उपायुक्त किंवा पोलीस काम करत नसतील तर ती नेतृत्वाच्या नात्याने माझी जबाबदारी आहे.

शहरातील वाहतूक कोंडी हे माझे अपयश आहे. वाहतूक हा शहर नियोजनाचा भाग आहे. मी जबाबदारी झटकत नाही. मात्र अरुंद रस्ते, अतिक्रमण, पायाभूत सुविधांची कामे, खड्डे, पाऊस हीदेखील वाहतूक कोंडीमागील कारणे आहेत. यापुढील काळात अधिकाधिक कर्मचारी रस्त्यांवर असतील, असे आश्वासनही आयुक्तांनी दिले.

टोळ्यांची कुंडली तयार

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) हा एक कायदा आहे. यात पोलिसांना अधिकार देण्यात आले आहेत. मोक्का कारवाईमध्ये आरोपीला जामीन मिळत नाही. तुम्ही एक बदमाषी कराल तर मी दहा बदमाषा करीन असा एकप्रकारे इशारा देत, आम्ही टोळ्यांची कुंडली तयार केली, असे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

भोग्यांचा आवाज कमी हाेईल

हल्ली आवाज कुणालाच सहन होत नाही. दोन वर्षांनंतर सण साजरे करण्याची संधी मिळाल्याने गणेशोत्सव व इतर सणांमध्ये आवाजावर नियंत्रण ठेवू शकलो नाही. आम्हाला कुणावर केस दाखल करायच्या नव्हत्या. मात्र आता पोलिसांनी लाउडस्पीकर आणि पबवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यापुढील काळात मंदिरांसह मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

स्वयंशिस्त महत्त्वाची

क्रिकेटमध्ये फलंदाज हेल्मेट घालत नव्हते. अपघात झाल्यानंतर वापर सुरू झाला; पण वाहनचालक कधी घालणार? सायकलस्वारसुद्धा घालतो. मग वाहनचालकांना काय प्रॉब्लेम आहे? चारचाकी चालविताना सीट बेल्ट बांधणे, रस्त्यात न थुंकणे, वाहतुकीचे नियम पाळणे यांकरिता स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याकडे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस