शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

सुभाषचंद्र बोस बोस यांनी इंग्रज सत्तेचा बीमोड केला : संभाजी नाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:13 AM

गराडे:सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कायमच अग्रणी राहिले. 'भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.सुभाषबाबूंची जयहिंद ...

गराडे:सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कायमच अग्रणी राहिले. 'भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.सुभाषबाबूंची जयहिंद ही सिंहगर्जना भारताच्या कानाकोप-यात घुमली.आझाद हिंद सेनेची स्थापना करुन इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले..नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रज सत्तेचा बिमोड केला असे प्रतिपादन वीर नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष संभाजी नाटकर यांनी केली.

भिवरी येथील वीर नेताजी तरुण मंडळ व वीर नेताजी क्रिडा मंडळ यांच्यावतीने सुभाषचंद्र बोस यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले पुरंदर वरून वीर नेताजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुभाषज्योत आणली.सुभाषज्योत मिरवणूक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी श्री.नाटकर बोलत होते.

यावेळी धनंजय चौधरी,नामदेव ढवळे,रामदास कटके , शहाजी लोणकर ,दत्ताञय ताम्हाणे ,जगन्नाथ कटके,म्हस्कू दळवी, सखाराम कटके, भाऊसाहेब कटके, बाळासाहेब कटके, सुहास कटके ,अशोक जगदाळे , राहुल कटके ,सुभाष लोणकर,आप्पासाहेब सावंत, किरण कटके, गौतम बागमार ,ललितकुमार मानकर , मोहन कटके,एस.पी.दळवी,नानासाहेब येळवंडे आदीसह कार्यकर्ते ,भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार संजय जगताप यांनी भिवरी येथे येवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती चिरंतन टिकून त्याचा प्रचार व प्रसार व्हावा व समाज संघटित होवून समाजसुधारणा व्हावी या उद्देशाने तत्कालीन पदाधिका-यांनी १९६८ साली वीर नेताजी मंडळाची स्थापना केली.तेव्हापासून आजपर्यंत त्या उद्देशाप्रमाणे अखंडीतपणे सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असल्याचे माऊली दळवी सांगितले. प्रास्तविक बाबाजी घिसरे यांनी केले.सुञसंचालन माऊली घारे यांनी केले.आभार अभिजीत दळवी यांनी मानले.

भिवरी (ता.पुरंदर ) येथे सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी संभाजी नाटकर व वीर नेताजी मंडळाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते .