शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

विधी प्रवेशप्रक्रिया लांबल्याने विद्यार्थी त्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमोल अवचिते पुणे : विधी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल २७ व २८ नोव्हेंबर २०२० रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमोल अवचिते

पुणे : विधी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल २७ व २८ नोव्हेंबर २०२० रोजी घोषित झाला. त्यानंतर कॅप राऊंडची सुरुवात झाली. २९ जानेवारी २०२१ रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. त्यांनतर प्रवेशासाठी १ ते ४ फेब्रुवारी ही अंतिम तारीख प्रवेश घेण्यासाठी दिली होती. त्यामुळे प्रवेशासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागातून विद्यार्थी पुण्यात आले. परंतु, महाविद्यालयात गेल्यानंतर सीईटी सेलची लिंक चालत नसल्याने विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत प्रवेश घेता आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

दिलेल्या वेळेत प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, पंजाब आदी राज्यांतून विद्यार्थी व पालक पुण्यात दाखल झाले. प्रवेश मिळेल या आशेने विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात वेळे आधी पोहोचले. मात्र, १ फेब्रुवारीला लिंक सुरू झालीच नाही. त्यामुळे प्रवेश घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २ ला देखील लिंक सुरू झालीच नाही. हा प्रकार प्रवेशाच्या (दि. ४) अंतिम तारखेपर्यत असाच प्रकार सुरू राहिल्याने तब्बल चार दिवस विद्यार्थ्यांसह पालकांना पुण्यात राहावे लागले. संबंधित विभागाला तक्रार केली असता प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा नव्याने दि. ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सीईटी सेलच्या भोंगळ कारभाराला वैतागून विद्यार्थ्यांनी व पालकांना परतीचा मार्ग धरला.

चौकट

दर वर्षी तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास

मराठवाडा, गडचिरोली, गोंदिया व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राहणारे विद्यार्थी अनेक दूरचा प्रवास करत पुण्यात आले. चार दिवसांपासून राहण्याची अडचण निर्माण झाली. पैशांची अडचण निर्माण झाली. लॉ सीईटी सुरू होऊन ५ वर्ष होऊन सुद्धा दरवर्षी त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला सांगितले.

--

नेमके जबाबदार कोण, याची चौकशी करावी

चार दिवस पुण्यात थांबून देखील तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश घेता आला नाही. प्रवेशासाठी आणलेले पैसे खर्च झाले. आता नव्याने दिलेल्या वेळेत पुण्यात यावे लागणार आहे. जर पुन्हा असे घडले तर याला जबाबदार कोण असणार आहे. सीईटी सेलच्या पुण्याच्या कार्यालयाने मुंबईच्या कार्यालयात संपर्क साधा, असे सांगितले. त्यामुळे नेमके याला जबाबदार कोण याची चौकशी शासनाने केली पाहिजे, अशी मागणी एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना केली.