शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लोकमान्य आणि अण्णा भाऊंच्या साहित्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी : अरुणा ढेरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 19:19 IST

माणसातील स्वत्व जागृत करण्याचे काम लोकमान्यांनी केले तर वंचितांच्या प्रश्नांकडे अण्णा भाऊंनी लक्ष वेधले.

ठळक मुद्देअण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वषार्रंभ व लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ग्रंथदिंडी१ ऑगस्टला राज्य शासनाने सुटी जाहीर करावी

पुणे : लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे या महाराष्ट्र घडवणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती आहेत. दोघांच्या साहित्यातून स्फूर्ती मिळते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन देश घडवावा, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वषार्रंभानिमित्ताने आज संवाद पुणे आणि श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

महापौर मुक्ता टिळक, अण्णा भाऊंच्या सून सावित्रीबाई साठे लोकमान्य टिळक यांचे पणतु दीपक टिळक, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष सुनील कांबळे, महोत्सवाचे निमंत्रक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांच्या उपस्थितीत पालखीचे, ग्रंथांचे पूजन करण्यात आले. सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. अण्णा भाऊ साठे यांच्या ग्रंथसंपदेसह लोकमान्य टिळक यांचा गीतारहस्य हा ग्रंथही पालखीत ठेवला होता.ढेरे म्हणाल्या, आजची दिंडी ही ऐतिहासिक घटना आहे. अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या साहित्यातून समरसता हेच सूत्र दिसून येत आहे. भारत पारतंत्र्यात साहित्य लिहिणे अवघड होते. हे वाचूनच आपल्यासमोर कामाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. आता सगळ्यांनी एकत्र येऊन देश घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दीपक टिळक म्हणाले, अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक या महापुरुषांनी मानवाच्या स्वातंत्र्याचा विचार केला. माणसातील स्वत्व जागृत करण्याचे काम लोकमान्यांनी केले तर वंचितांच्या प्रश्नांकडे अण्णा भाऊंनी लक्ष वेधले. साठे यांच्या लिखाणामुळे प्रस्थापित साहित्याचा केंद्रबिंदू बदलला. साहित्यातून परिवर्तन घडू शकते हे या दोघा महापुरुषांच्या साहित्यातून दिसून येते.

दोघांनी आपल्या सहित्यातून निद्रित समाजाला जागे केले. लोकमान्य आणि अण्णा भाऊंच्या साहित्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करायला हवे, असे आवाहन मुक्ता टिळक यांनी केले. 

ग्रंथदिंडीत महाविद्यालयीन विद्यार्थी, साहित्यिक,कलावंत, आळंदीतील बालकीर्तनकार यांचा समावेश होता. बालकिर्तनकारांनी टाळ-मृदंगाचा गजर केला. तर बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली.सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथदिंडी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक,नारायण पेठमार्गे येऊन केसरीवाड्यात दिंडीचा समारोप झाला. केसरीवाड्यात टिळक कुटुंबियांतर्फे रोहित टिळक यांनी ग्रंथदिंडीचे स्वागत केले................

१ ऑगस्टला राज्य शासनाने सुटी जाहीर करावीपुण्यात पहिल्यांदाच आले आहे. अण्णा भाऊंची स्नूषा म्हणून मिळालेला सन्मान माज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वषार्रंभानिमित्ताने टिळक आणि साठे कुटुंबिय पहिल्यांदाच एकत्र आल्याने मन भरुन आले आहे. महारुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त राज्य शासनातर्फे सुट्टी दिली जाते. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ आॅगस्टला राज्य शासनाने सुटी जाहीर करावी, अशी मागणी साठे यांच्या स्नूषा सावित्रीबाई साठे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकAruna Dhereअरुणा ढेरे