पुणे : लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे या महाराष्ट्र घडवणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती आहेत. दोघांच्या साहित्यातून स्फूर्ती मिळते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन देश घडवावा, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वषार्रंभानिमित्ताने आज संवाद पुणे आणि श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
दोघांनी आपल्या सहित्यातून निद्रित समाजाला जागे केले. लोकमान्य आणि अण्णा भाऊंच्या साहित्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करायला हवे, असे आवाहन मुक्ता टिळक यांनी केले.
ग्रंथदिंडीत महाविद्यालयीन विद्यार्थी, साहित्यिक,कलावंत, आळंदीतील बालकीर्तनकार यांचा समावेश होता. बालकिर्तनकारांनी टाळ-मृदंगाचा गजर केला. तर बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली.सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथदिंडी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक,नारायण पेठमार्गे येऊन केसरीवाड्यात दिंडीचा समारोप झाला. केसरीवाड्यात टिळक कुटुंबियांतर्फे रोहित टिळक यांनी ग्रंथदिंडीचे स्वागत केले................
१ ऑगस्टला राज्य शासनाने सुटी जाहीर करावीपुण्यात पहिल्यांदाच आले आहे. अण्णा भाऊंची स्नूषा म्हणून मिळालेला सन्मान माज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वषार्रंभानिमित्ताने टिळक आणि साठे कुटुंबिय पहिल्यांदाच एकत्र आल्याने मन भरुन आले आहे. महारुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त राज्य शासनातर्फे सुट्टी दिली जाते. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ आॅगस्टला राज्य शासनाने सुटी जाहीर करावी, अशी मागणी साठे यांच्या स्नूषा सावित्रीबाई साठे यांनी केली आहे.