शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

पंचविशीच्या आतील विद्यार्थीच निवडणुकीस पात्र          

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 19:14 IST

एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र असतील. त्यामुळे शिक्षणाची आवड असणारे गुणवत्ताधारक विद्यार्थीच निवडणूक लढवू शकतील,

ठळक मुद्देविद्यापीठ प्रशासनाने प्राचार्य व पोलीस प्रशासनाबरोबर निवडणुकांबाबत चर्चा निवडणूक काळात महाविद्यालयाच्या आवारात आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणारकोणत्याही अपराधाकरिता दोषी ठरवलेला विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र

पुणे : महाविद्यालय व विद्यापीठामध्ये खुला पध्दतीने होणाऱ्या निवडणुकांमध्ये केवळ २५ वर्षे वयाच्या आतील विद्यार्थीच निवडणुकीसाठी पात्र असतील. त्यातही मान्यताप्राप्त,नियमित आणि पूर्णवेळ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढवता येईल. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र असतील. त्यामुळे शिक्षणाची आवड असणारे गुणवत्ताधारक विद्यार्थीच निवडणूक लढवू शकतील, असे निवडणुकीच्या नियमावलीवरून स्पष्ट होत आहे.

महाविद्यालयांमधील खुल्या निवडणुकांच्या तयारीला सुरूवात झाली असून विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्य व पोलीस प्रशासनाबरोबर निवडणुकांबाबत चर्चा केली आहे. महाविद्यालय विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य हे प्राधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर निवडणूक काळात महाविद्यालयाच्या आवारात आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार करता येणार नाही. तर विद्यार्थी उमेदवाराला निवडणूक प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या आवारात शांतता व सलोखा राखण्यासाठी स्वयंप्रेरणेने मदत करावी लागेल.

उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यापासून सात शैक्षणिक वर्ष पूर्ण केलेले असतील. तसेच कोणत्याही विद्यापीठ परीक्षेतील गैरप्रकारामध्ये गुंतल्यामुळे किंवा कोणतीही गैरवर्तन केल्यामुळे सक्षम अधिकाऱ्याने विद्यार्थ्याला शिक्षा केली असल्यास संबंधित विद्यार्थी निवडणूक लढवू शकणार नाही. नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही अपराधाकरिता दोषी ठरवलेला विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र असेल . त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या व गुणवंत विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढवता येईल.विद्यार्थी निवडणुकांसाठी काही विद्यार्थी पुन्हा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला निवडणूक लढता येणार नाही. तसेच निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही शैक्षणिक वर्षातील ३० सप्टेबर रोजीपर्यंत पंचवीस वर्ष एवढीच असावी. राखीव प्रवर्गाच्या प्रतिनिधींकडे निवडणुकीचा अर्ज सादर करताना सक्षम अधिकाऱ्या ने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. --

महाविद्यालयामध्ये शांततापूर्ण वातावरणात निवडणुका व्हाव्यात, या उद्देशाने सर्व बाजूंचा विचार करून महाविद्यालयीन निवडणुकांची नियमावली तयार केली आहे. विद्यार्थी निवडणुकांमुळे यापूर्वी महाविद्यालयात खून, मारामाऱ्या अशा घटना घडल्या होत्या. परिणामी प्राचार्य व संस्थाचालकांनी निवडणुकांंना विरोध केला होता. त्यामुळे यंदा या निवडणुकांबाबत काळजी घेतली जात आहे.पंचवीस पेक्षा जास्त वर्षे वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक लढवता येऊ नये. तसेच केवळ निवडणुकांसाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अटकाव बसावा, याचा विचार करून निवडणुकांबाबतची नियमावली तयार केली आहे.- डॉ.ए.पी.कुलकर्णी,प्रांतप्रमुख,विद्यापीठ विकास मंच,

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयElectionनिवडणूकStudentविद्यार्थी