शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वेल्हे तालुक्यातील विद्यार्थी वाऱ्यावर, अनेक शिक्षक रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 00:12 IST

अनेक शिक्षक रजेवर : तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या पाहणीत वास्तव उघड

मार्गासनी : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया हा प्राथमिक शाळेत असतो. या काळात विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम हे शिक्षक करत असतात; मात्र जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागले आहे. तालुक्यातील अनेक शाळांतील शिक्षक केवळ साध्या अर्जावर तीन तीन दिवस शाळेला दांडी मारत असल्याचा प्रकार तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या पाहणीत उघडकीस आला आहे. याबाबत शिक्षणाधिकाºयांना अहवाल देऊनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, या काळात गुरुजीविना शाळा असेच चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

वेल्हे तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगरी असून, येथील विद्यार्थी पूर्णपणे जिल्हा परिषद शाळांवर अवलंबून आहेत; मात्र दांडीबहाद्दर शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षकांना मोठे पगार असूनदेखील हे शिक्षक शाळांवर लक्ष न देता आपल्या वरिष्ठांच्या मर्जीने वावरताना दिसत आहेत. शाळेच्या वेळात येथील शिक्षक पानशेत, वेल्हे, तोरणा, राजगड परिसरात फिरताना दिसत आहेत, तर काही शाळांवरील शिक्षक चार-पाच दिवस सलग येत नाहीत; तसेच काही शाळा तर पाच-सहा दिवस बंदच असतात. असे असतानाही पगार मात्र वेळेवर शिक्षकांना दिला जातोय. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींच्या भेटीगाटी आॅनलाइनची कामे करणे, माहिती भरणे आदी कामांच्या नावाखाली शाळेच्या वेळेत कामचुकार शिक्षक इतरत्र फिरताना दिसत आहेत.शिक्षक एकमेकांत कुरघोड्या व राजकारण करताना दिसत आहेत. शिक्षक संघटनेच्या एका कार्यक्रमात उद्घाटन कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरून मोठा वाद-विवाद झाला होता हा वाद-विवाद एवढा विकोपाला गेला की, वेल्हे पोलिसांकडून येथील शिक्षकांना १४९च्या नोटिसा दिल्या गेल्या होत्या. लोकसभा निवडणुकीचा तयारीचा भाग म्हणून मतदान केंद्राची पाहणी करताना वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे व गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी पानशेत परिसरातील शाळांना भेटी दिल्या होत्या. यामध्ये दापसरे येथील शाळेत फक्त चार विद्यार्थी आहेत. मात्र, या दिवशी एकही विद्यार्थी शाळेत हजर नव्हता, साळवे शिक्षक हजर होते तर बबन खामकर शिक्षक गैरहजर असल्याचे दिसले. तर कोशीमघर शाळेत अतिशय गंभीर परिस्थिती पाहायवयास मिळाली. मुख्याध्यापक शहाजी सोपान पोकळे १४ मार्चपासून हजेरी पटावर स्वाक्षरीच केली नसल्याचे समोर आले. यावेळी येथील शिक्षक लडकत म्हणाले की, मुख्याध्यापक पोकळे सर हे १४ व १५ मार्च रोजी प्रशिक्षणासाठी गेले होते. मात्र, १६ मार्चपासून पोकळे विनापरवाना गैरहजर असल्याचे समोर आले आहे. तसेच, टेकपोळे शाळेत एकच विद्यार्थी असून येथील शिक्षक श्रीकांत सुकरेवार गैरहजर होते. तर टेकपोळे शाळा बंदच होती. तर यापूर्वीही दिवाळी दरम्यान गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी वाजेघर, राजगड परिसरात शाळांत भेटी दिल्या असता त्यावेळी देखील अनेक शिक्षक गैरहजर होते. याबाबत जिल्हाशिक्षणाधिकारी कुºहाडे यांच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.दिनांक ३० मार्च रोजी गटविकासअधिकारी मनोज जाधव यांनी वेल्हे तालुक्यातील बारा गाव मावळ परिसरातील शाळांना भेट देऊन शाळांच्या तपासण्या केल्या. यात हारपुड शाळेतील शिक्षक एस.डी.रेंगडे यांनी २७ मार्च ते २९ मार्चपर्यंत तीन दिवसांचा किरकोळ रजेचा फक्त रजेच्या अर्ज ठेवून गेले होते. त्यावर केंद्रप्रमुखांची शिफारस नव्हती व रजेचा अर्ज शाळेतच ठेवून ही बाब गंभीर व दिशाभूल करणारी आहे.कोळंबी येथील राजू शिवाजी भोंग हे शाळेवर गैरहजर होते व त्यासंबंधित कोणताही अर्ज व माहिती शिक्षण विभागाकडे नव्हती. वरोती येथील जि.प.शाळेतील हरिप्रसाद सवणे हे २६ मार्च पासून शाळेत गैरहजर होते, या भेटीमध्ये आढळलेल्या बाबी या गंभीर स्वरूपाच्या असून संबंधित शिक्षकांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत सर्व स्तरावर होत आहे.संबंधित शिक्षकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. खुलासा आल्यानंतर त्यांच्या रजा या विनावेतन करणार आहे.- संजय तांबे, गटशिक्षणाधिकारी वेल्हे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी