शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

उद्योगनगरीचा श्वास गुदमरतोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:55 IST

शहरातील वाहनांमुळे वायू प्रदूषण होत आहे. येथील कारखानदारीबरोबरच खासगी वाहनांचा वापरही प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत...

- विश्वास मोरे-  पिंपरी : केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला असला तरी पर्यावरण रक्षणाकडे सत्ताधारी आणि प्रशासनास अपयश येत आहे. पाणी आणि हवा-वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत आहे. अर्थात स्मार्ट सिटीचा श्वास गुदमरतो आहे. पिंपरी-चिंचवड हे शहर औद्योगिकनगरी म्हणून आशिया खंडात परिचित आहे. त्यामुळे याठिकाणी कामगार आणि कष्टकरी वर्गाचे वास्तव्य आहे. नागरिकीकरणाबरोबरच शहराचा विस्तारही होत आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने  दुचाकी, चारचाकी वाहन वापराचे प्रमाण अधिक आहे. कारखानदारीमुळे नद्यांचा गळा घोटला जात आहे. तसेच परिवहन कार्यालयात दरवर्षी सुमारे दिड लाख वाहनांची नव्याने नोंद होत आहे. त्यामध्ये एक लाख दुचाकींचा समावेश आहे.  वायू प्रदूषणाने स्मार्ट सिटीचा आता श्वास गुदमरत आहे.  वाढत्या वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात काढला आहे. उपाययोजनांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अधिक वाहनेच प्रदूषणाचे कारण  शहरातील वाहनांमुळे वायू प्रदूषण होत आहे. येथील कारखानदारीबरोबरच खासगी वाहनांचा वापरही प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. दिवसाला दोनशे नवीन वाहनांची भर पडत आहे.   गेल्या वर्षभरात हवेची गुणवत्ता अनेक वेळा वाईट ते अतिवाईट दरम्यान होती. त्यामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम झाले आहेत.प्रदूषणाची कारणेवाहनांमध्ये जाळल्या जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि वायू इंधनांमुळे वातावरणात सतत वायू मिसळला जात आहे. सतरा लाख वाहने रस्त्यावर आहे. हवेत कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन आॅक्साईडस, पार्टीक्युटेल मॅटर या घातक घटकांचा समावेश आहे. पेट्रोलच्या मानाने डिझेल इंजिनातून बाहेर पडणाºया धुराची आणि पयायार्ने घातक घटकांची तीव्रता अधिक आहे. हवेच्या  नैसर्गिक टक्केवारीमध्ये बदल झाला आहे. पेट्रोल, डिझेल इंधनाच्या ज्वलनातून धुरावाटे गंधक वायू बाहेर पडतात.  

* दृष्यपरिणाम मानव, वनस्पती, प्राणी यांना भोगावा लागत आहे. धुळीचे कण, झाडे, झुडपांमधील धूळ, वाहनांमधील जीवाश्म इंधने, औष्णिक उर्जा यातून वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे विकार वाढले. कोळसा, पेट्रोलियम आणि आम्लवर्षा, इंधनाचा वापर, वाहनांमधून निघणाºया सल्फर आॅक्साइडमुळे कर्करोग, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी आदी आजार होतात. वाहनांमधून निघणाºया धूरातील नायट्रोजन आॅक्साइडमुळे फुफ्फुसाचा दाह, जंतू संसर्ग, श्वसनाचा अडथळा, छाती भरून येणे आदी विकार होतात. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी