शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

उद्योगनगरीचा श्वास गुदमरतोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:55 IST

शहरातील वाहनांमुळे वायू प्रदूषण होत आहे. येथील कारखानदारीबरोबरच खासगी वाहनांचा वापरही प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत...

- विश्वास मोरे-  पिंपरी : केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला असला तरी पर्यावरण रक्षणाकडे सत्ताधारी आणि प्रशासनास अपयश येत आहे. पाणी आणि हवा-वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत आहे. अर्थात स्मार्ट सिटीचा श्वास गुदमरतो आहे. पिंपरी-चिंचवड हे शहर औद्योगिकनगरी म्हणून आशिया खंडात परिचित आहे. त्यामुळे याठिकाणी कामगार आणि कष्टकरी वर्गाचे वास्तव्य आहे. नागरिकीकरणाबरोबरच शहराचा विस्तारही होत आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने  दुचाकी, चारचाकी वाहन वापराचे प्रमाण अधिक आहे. कारखानदारीमुळे नद्यांचा गळा घोटला जात आहे. तसेच परिवहन कार्यालयात दरवर्षी सुमारे दिड लाख वाहनांची नव्याने नोंद होत आहे. त्यामध्ये एक लाख दुचाकींचा समावेश आहे.  वायू प्रदूषणाने स्मार्ट सिटीचा आता श्वास गुदमरत आहे.  वाढत्या वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात काढला आहे. उपाययोजनांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अधिक वाहनेच प्रदूषणाचे कारण  शहरातील वाहनांमुळे वायू प्रदूषण होत आहे. येथील कारखानदारीबरोबरच खासगी वाहनांचा वापरही प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. दिवसाला दोनशे नवीन वाहनांची भर पडत आहे.   गेल्या वर्षभरात हवेची गुणवत्ता अनेक वेळा वाईट ते अतिवाईट दरम्यान होती. त्यामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम झाले आहेत.प्रदूषणाची कारणेवाहनांमध्ये जाळल्या जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि वायू इंधनांमुळे वातावरणात सतत वायू मिसळला जात आहे. सतरा लाख वाहने रस्त्यावर आहे. हवेत कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन आॅक्साईडस, पार्टीक्युटेल मॅटर या घातक घटकांचा समावेश आहे. पेट्रोलच्या मानाने डिझेल इंजिनातून बाहेर पडणाºया धुराची आणि पयायार्ने घातक घटकांची तीव्रता अधिक आहे. हवेच्या  नैसर्गिक टक्केवारीमध्ये बदल झाला आहे. पेट्रोल, डिझेल इंधनाच्या ज्वलनातून धुरावाटे गंधक वायू बाहेर पडतात.  

* दृष्यपरिणाम मानव, वनस्पती, प्राणी यांना भोगावा लागत आहे. धुळीचे कण, झाडे, झुडपांमधील धूळ, वाहनांमधील जीवाश्म इंधने, औष्णिक उर्जा यातून वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे विकार वाढले. कोळसा, पेट्रोलियम आणि आम्लवर्षा, इंधनाचा वापर, वाहनांमधून निघणाºया सल्फर आॅक्साइडमुळे कर्करोग, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी आदी आजार होतात. वाहनांमधून निघणाºया धूरातील नायट्रोजन आॅक्साइडमुळे फुफ्फुसाचा दाह, जंतू संसर्ग, श्वसनाचा अडथळा, छाती भरून येणे आदी विकार होतात. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी