शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणाला ‘एनएसएस’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १८ वर्षे वयापुढील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. मात्र, आरोग्य विभागाकडे असणारे मनुष्यबळ राज्यातील ...

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १८ वर्षे वयापुढील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. मात्र, आरोग्य विभागाकडे असणारे मनुष्यबळ राज्यातील सर्व जनतेला लस देण्यासाठी पुरेसे नाही. त्यामुळे राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यापीठातून हजारो विद्यार्थी पुढे येत आहेत. परिणामी लसीकरणाच्या मोहिमेत एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे बळ कामी येणार आहे.

उच्चशिक्षण विभाग व आरोग्य विभाग संयुक्तिकपणे लसीकरण मोहिमेत काम करणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालकांशी संवाद साधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिमेमध्ये समाविष्ट करण्याबाबत नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांची सहमती घेतली जात आहे. सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून एक दिवसाचे प्रशिक्षण देणार आहे. हे विद्यार्थी प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेत विविध पातळ्यांवर मदत करू शकतात. आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या सूचनेनुसार लसीकरण संदर्भातील नोंदी ठेवणे किंवा इतर कामे त्यांच्यावर सोपविली जाणार आहेत. दोन दिवसांत जळगाव विद्यापीठातील सुमारे ९०० विद्यार्थी तयार झाले आहेत. इतरही विद्यापीठांमधील हजारो विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होण्यास तयार आहेत, असेही एनएसएस राज्य जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले.

चौकट

एका विद्यार्थ्याने घेतले सुमारे दहा कुटुंब दत्तक

केंद्र शासनाने १८ वर्ष पुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एनसीसीचे स्वयंसेवक प्रत्येक गावात व आपल्या परिसरातील नागरिकांचे लसीकरणाबाबत प्रबोधन करणार आहेत. मागील वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिर व गरजूंना आवश्यक मदत करण्याचे काम केले होते. त्यासाठी एका विद्यार्थ्याने सुमारे दहा कुटुंब दत्तक घेतले होते. हेच काम आता मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. पुणे विद्यापीठाचे सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढे येतील, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट

कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी कोरोना विरुद्धच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेत राज्यातील सर्व विद्यापीठांमधील एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने मदतीसाठी सहभागी होणार आहेत. १८ वर्षापुढील एकही व्यक्ती लस घेण्यापासून सुटू नये, यासाठी एनएसएस स्वयंसेवक जनजागृती करणार आहेत.

- डॉ. प्रभाकर देसाई, एनएसएस राज्य जनसंपर्क अधिकारी