शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुढच्या आठवड्यात ठरणार विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना- हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 16:45 IST

विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली...

इंदापूर (पुणे) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात व विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत आहे. पुढच्या आठवड्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधन केंद्रात राज्यातील निवडक २१ कार्यकर्त्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अपयशाची कारणमीमांसा शोधली जाईल. विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, ॲड. मनोहर चौधरी, मारुतराव वणवे, बाबा महाराज खारतोडे, ॲड. अशोक कोठारी, राजकुमार जाधव, वाहतूक संघाचे अध्यक्ष रघुनाथ राऊत, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात चांगला कौल मिळाला. महाराष्ट्र विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे घटक म्हणून आमची जी भूमिका होती, ती मी व आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत चांगल्या पद्धतीने पार पाडली. मात्र, यश मिळाले नाही. शेवटी जनता श्रेष्ठ आहे. तिने दिलेला कौल मान्यच करावा लागतो. कुठे काय चुकले, याबाबत ज्या त्या पक्षांच्या स्तरावर विचारविनिमय होईल. इंदापूर तालुक्यात पक्ष पातळीवर बैठक घेतली जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

केंद्र शासनाच्या सहकार्याने व आर्थिक मदतीने इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे सिंचन, उद्योग, रेल्वेचे दळणवळण हे प्रश्न केंद्राकडून सोडवून घ्यावे लागतील. मच्छीमारी, दुग्ध व्यवसाय, मुद्रा योजना, प्रक्रिया उद्योग अशा केंद्राच्या विविध योजना आणि केंद्र शासनाच्या योजना आणण्यासाठी माझा पुढाकार राहील, अशी हमी पाटील यांनी दिली.

१४ जून रोजी पुण्यात दिल्ली येथील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साखर उद्योगाबाबत बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत शंभर दिवसांचा कार्यक्रम आखण्याची सूचना प्रशासनास दिली आहे. या कार्यक्रमात सहकार, अर्थ, वाणिज्य, कृषी व प्रक्रिया उद्योग या महत्त्वाच्या खात्यांशी संबंधित असणाऱ्या साखर उद्योगाचा समावेश होण्याबाबत आपला प्रयत्न आहे. कारण, साखर उद्योगाचा त्या कार्यक्रमात समावेश झाला तर त्याचा मोठा फायदा पुढच्या दहा वर्षांत या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या वर्गास होईल. धोरण तयार होईल. अमित शाह यांच्याकडे सहकार खाते आहेच. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केंद्रीय सहकार खात्याचे राज्यमंत्रिपद दिल्याचा फायदा होईल, असे पाटील म्हणाले.

दूध दराबाबत दुग्धविकास मंत्र्यांशी चर्चा

उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी दिली जावी. दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये दर असलाच पाहिजे. पाच रुपयांचे अनुदानही मिळावे, अशी मागणी आपण दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. दुष्काळी स्थिती व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर समाधानकारक पाऊस पडेपर्यंत टँकर बंद करू नयेत, अशी सूचना आपण प्रशासनास दिली आहे. बियाणे, खतांची मुबलक उपलब्धता करून देण्याचीही सूचना संबंधित विभागास दिली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलPuneपुणेvidhan sabhaविधानसभा