शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:00 IST

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध पदांच्या ५०० च्यावर जागांसाठी भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती.

पुणे: राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सिनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, नर्सेस यासारख्या विविध पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल १९ एप्रिलला जाहीर करण्यात आला तसेच पात्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आज (दि.२२) पुण्यात बोलावले होते. मात्र प्रत्यक्ष ठिकाणी पात्र उमेदवारांऐवजी वेगळ्याच उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे यादीत नाव न आलेल्या पात्र उमेदवारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 

राज्य सरकारच्याआरोग्य विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांच्या जवळपास ५०० च्यावर जागांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवारांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल १९ एप्रिलला जाहीर झाला. त्यात उत्तीर्ण व पात्र उमेदवारांची नावे वेबसाईटवर जाहीर करण्यात आली होती. तसेच त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पुण्यातील आरोग्य विभागाच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. त्यामुळे परिसरात उमेदवारांची एकच गर्दी जमा झाली होती. मात्र,आज ज्या पात्र मंडळींना बोलावण्यात आले होते ते तिथे पोहचल्यावर  भलतीच नावे प्रसिद्ध झाली होती. त्या उमेदवारांमध्ये यवतमाळ, नांदेड, अमरावती, औरंगाबाद अशा विविध ठिकाणाहून आलेल्यांची संख्या मोठी होती. या आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळावर संतप्त उमेदवारांनी तीव्र रोष व्यक्त केला. यासंबंधी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

एक उमेदवार महिला म्हणाली, सिनियर क्लार्क पदासाठी एनटी विभागातून मी परीक्षा दिली होती. त्यात मला १४८ गुण मिळाले आहे. मात्र आता इथे आल्यावर समजले की विभागाने ती जागाच घेतलेली नाही. जर तुम्हाला ५० टक्के जागांचीच भरती करायची होती तर त्याचवेळी हॉल तिकीट वगैरे रद्द देणे गरजेचे नव्हते. ऐनवेळी जागाच रद्द केल्यामुळे सर्वच मेहनत वाया गेली.त्यात मानसिक त्रास पण सहन करावा लागत आहे.

गणेश क्षीरसागर म्हणाला, अनुसुचित जाती प्रवर्गातून आरोग्य विभागाच्या निघालेल्या पदासाठी परीक्षा दिली होती.मात्र जाहीर करण्यात आलेल्या अंतिम यादीत सर्वाधिक गुण असून देखील मला डावलले गेले आहे. व माझ्या जागी ६६ गुण असलेल्या व्यक्तीचे नाव नमूद करण्यात आले आहे. या निवडीवर माझा तीव्र आक्षेप आहे.

याबाबत श्रीकांत देशपांडे म्हणाले, माझ्या पत्नीने लॅब टेक्निशियन पदासाठी परीक्षा दिली होती. त्यात तिला ११२ गुण मिळाले आहे. तिला कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आज आरोग्य विभागाच्या कार्यालयात बोलावले होते. मात्र तिथे गेल्यावर तिचे नावच नसल्याचे निदर्शनास आले. तसेच तिथे चौकशी केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाHealthआरोग्यState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीRajesh Topeराजेश टोपे