शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:00 IST

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध पदांच्या ५०० च्यावर जागांसाठी भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती.

पुणे: राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सिनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, नर्सेस यासारख्या विविध पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल १९ एप्रिलला जाहीर करण्यात आला तसेच पात्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आज (दि.२२) पुण्यात बोलावले होते. मात्र प्रत्यक्ष ठिकाणी पात्र उमेदवारांऐवजी वेगळ्याच उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे यादीत नाव न आलेल्या पात्र उमेदवारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 

राज्य सरकारच्याआरोग्य विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांच्या जवळपास ५०० च्यावर जागांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवारांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल १९ एप्रिलला जाहीर झाला. त्यात उत्तीर्ण व पात्र उमेदवारांची नावे वेबसाईटवर जाहीर करण्यात आली होती. तसेच त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पुण्यातील आरोग्य विभागाच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. त्यामुळे परिसरात उमेदवारांची एकच गर्दी जमा झाली होती. मात्र,आज ज्या पात्र मंडळींना बोलावण्यात आले होते ते तिथे पोहचल्यावर  भलतीच नावे प्रसिद्ध झाली होती. त्या उमेदवारांमध्ये यवतमाळ, नांदेड, अमरावती, औरंगाबाद अशा विविध ठिकाणाहून आलेल्यांची संख्या मोठी होती. या आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळावर संतप्त उमेदवारांनी तीव्र रोष व्यक्त केला. यासंबंधी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

एक उमेदवार महिला म्हणाली, सिनियर क्लार्क पदासाठी एनटी विभागातून मी परीक्षा दिली होती. त्यात मला १४८ गुण मिळाले आहे. मात्र आता इथे आल्यावर समजले की विभागाने ती जागाच घेतलेली नाही. जर तुम्हाला ५० टक्के जागांचीच भरती करायची होती तर त्याचवेळी हॉल तिकीट वगैरे रद्द देणे गरजेचे नव्हते. ऐनवेळी जागाच रद्द केल्यामुळे सर्वच मेहनत वाया गेली.त्यात मानसिक त्रास पण सहन करावा लागत आहे.

गणेश क्षीरसागर म्हणाला, अनुसुचित जाती प्रवर्गातून आरोग्य विभागाच्या निघालेल्या पदासाठी परीक्षा दिली होती.मात्र जाहीर करण्यात आलेल्या अंतिम यादीत सर्वाधिक गुण असून देखील मला डावलले गेले आहे. व माझ्या जागी ६६ गुण असलेल्या व्यक्तीचे नाव नमूद करण्यात आले आहे. या निवडीवर माझा तीव्र आक्षेप आहे.

याबाबत श्रीकांत देशपांडे म्हणाले, माझ्या पत्नीने लॅब टेक्निशियन पदासाठी परीक्षा दिली होती. त्यात तिला ११२ गुण मिळाले आहे. तिला कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आज आरोग्य विभागाच्या कार्यालयात बोलावले होते. मात्र तिथे गेल्यावर तिचे नावच नसल्याचे निदर्शनास आले. तसेच तिथे चौकशी केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाHealthआरोग्यState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीRajesh Topeराजेश टोपे