शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबारायांच्या सोहळ्याची सांगता

By admin | Updated: August 11, 2015 03:50 IST

भाळी चंदनाचा गंध, मुखी विठुरायाचे नाम, हाती टाळ-वीणा, मृदंगाचा निनाद आणि अभंगाचा गजर करीत हलक्या पावसाच्या सरी पडत असताना भक्तिमय वातावरणात ठिकठिकाणी भंडाऱ्याची

देहूगाव : भाळी चंदनाचा गंध, मुखी विठुरायाचे नाम, हाती टाळ-वीणा, मृदंगाचा निनाद आणि अभंगाचा गजर करीत हलक्या पावसाच्या सरी पडत असताना भक्तिमय वातावरणात ठिकठिकाणी भंडाऱ्याची उधळण करीत श्री संत तुकाराममहाराज पालखीचे सोमवारी दोनच्या सुमारास आषाढवारी करून देहूत आगमन झाले. देहूकरांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे आनंदमय वातावरणात स्वागत केले. पालखीची ३३० वी आषाढी वारी संपन्न झाली.पहाटे नित्यपूजा उरकल्यानंतर पिंपरी येथून पालखी देहूगावाकडे निघाली असता, रस्त्यात ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. पालखीचे स्वागत देहूगावच्या उपस्थित ग्रामस्थांनी केले. पालखीसमवेत संस्थानाचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, सुनीलमहाराज दिगंबर मोरे, सुनील दामोदर मोरे, अशोक निवृत्ती मोरे,अभिजित मोरे,जालिंदर मोरे आदी उपस्थित होते.पालखी मंदिरासमोर आल्यानंतर महाद्वार आरती झाली. मुख्य मंदिरात दिलीप नारायण मोरे इनामदार यांनी संत तुकाराममहाराजांच्या पादुका डोक्यावर घेतल्या व त्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नेल्या. येथे बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर, हे माहेर संतांचे हा अभंग झाला. यानंतर दिलीप मोरे यांच्या हस्ते आरती झाली. आरती झाल्याबरोबर उपस्थित वारकऱ्यांनी ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ नामाचा जयघोष करीत पताका उंचावून तुतारी, शंख, नगारा व ताशाचा गजर व नाद केला. या वेळी मंदिराच्या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. आरतीनंतर चांदीची अब्दागिरी, सावलीचे रेशमी छत्र, गरूड टक्के, पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात प्रदक्षिणा घातली. भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी, मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानाच्या वतीने नारळप्रसाद देऊन सत्कार झाला. (वार्ताहर)प्रत्येक वर्षी पालखी परत येताना वारकऱ्यांची गर्दी खूपच कमी असते. मात्र या वर्षी पालखी माघारी येतानादेखील मोठ्या संख्येने वारकरी होते. गर्दी जास्त व पोलीस बंदोबस्त कमी अशी परिस्थिती होती. पालखी प्रस्थानाच्या तुलनेत बंदोबस्त कमी असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण करणे व वाहतूक सुरळीत ठेवणे पोलिसांना अवघड जात होते. पालखीबरोबर आलेली वाहने थेट गावात वारकऱ्यांसमवेत आली होती. परिणामी पालखी मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. देहू-आळंदी रस्ता बराच वेळ बंदच होता. दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी-चिंचवड भागातील शाळा सुटत असल्याने त्यांची वाहने गर्दीत अडकली होती.