शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलाचं पोट सुटलंय का?... सावधान; हा असू शकतो हाय ब्लड प्रेशरचा 'अलार्म'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 16:44 IST

भारतात दर पाचव्या प्रौढ व्यक्तीमध्ये आणि दर दहाव्या मुलांमध्ये निदान

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : भारतात दर पाचव्या प्रौढ व्यक्तीमध्ये आणि दर दहाव्या मुलामध्ये उच्च रक्तदाबाचे निदान होत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचे वजन १ किलोने वाढले की वरचा रक्तदाब वाढतो. मुलांमधील सुटलेले पोट हा उच्च रक्तदाबाचा ‘अलार्म’ आहे. प्रगत देशांमध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षापासून दर वाढदिवसाला मुलांचा रक्तदाब मोजला जातो. वयाच्या तिसऱ्या वर्षी पोटाचा घेर ५० सेंटीमीटर असेल आणि १३ व्या वर्षी पोटाचा घेर ८० सेंटीमीटर असेल तर स्थूलता आहे, असे समजावे आणि पालकांनी दर सहा महिन्यांनी मुलांची उंची, वजन आणि रक्तदाब तपासावा, असे डॉक्टरांनी सुचवले आहे.

भारतात सर्वाधिक मृत्यूचे कारण रक्तदाब हेच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्ले पाहिजे. मात्र, भारतीय लोक दररोज १०-२० ग्रॅम मीठ खातात. बेकरीच्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. चहा, कॉफीच्या सेवनामधूनही शरीरात मोठ्या प्रमाणात साखर जाते.  

डॉ. राहुल जोशी म्हणाले, ‘तरूणांमध्ये वाढता लठ्ठपणा ही चिंतेची बाब असून यामुळे उच्च रक्तदाबाची जोखीम वाढत आहे. तंबाखू सेवन, धुम्रपान आणि चुकीची जीवनशैली देखील मुख्य जोखमीचे घटक ठरू शकतात. ज्यांच्या कुटुंबात उच्च रक्तदाबाचा वैद्यकीय इतिहास आहे,त्यांच्या मते इतरांपेक्षा जास्त जोखीम असू शकते. ज्यांना सध्या उच्च रक्तादाबाचा त्रास नाही, त्यांच्यासाठी चांगली जीवनशैली ही गुरूकिल्ली ठरू शकते.’

रक्तदाब वाढण्याची कारणे 

- अनुवंशिकता हे उच्च रक्तदाबामागील मुख्य कारण आहे.- टीव्हीसमोर बसून राहणे, मोबाईल गरजेपेक्षा जास्त वेळ खेळताना मुलांच्या हालचाली कमी होतात आणि परिणामी वजन वाढते.- आहाराच मिठाचा अतिवापर, जंक फूडचे सेवन- ताणतणाव, बैैठी जीवनशैैली, व्यायमाचा अभाव- लठ्ठपणा

काय काळजी घ्यावी?

- जेवणात मिठाचा अतिरेक टाळावा.- दिवसातून चारवेळा पोटभर खाणे बंद करावे.- वजन संतुलित राखण्यावर भर असावा.- आहारात पालेभाज्या, कच्च्या भाज्या, कडधान्ये यांचे प्रमाण वाढवावे- व्यायाम आणि योगासनांवर भर द्यावा

चहापानाऐवजी पाणी, सॅलड, फळे यावर भर द्यावा

‘बैठे काम वाढले की साखरेचे कण एकत्र जोडून चरबी तयार होते. मुलांचा टीव्हीसमोरचा वेळ वाढला की पोटही वाढते. इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, रक्तदाब ५ अंकांनी वाढल्यास जीवनशैलीत बदल केला पाहिजे आणि १० अंकांनी वाढल्यास औषधोपचार सुरू केले पाहिजेत. नेहमीपेक्षा १ कप चहा जास्त प्यायल्यास शरीरात ५४ कॅलरी जास्त जातात. याप्रमाणे, वर्षाला ३ किलो वजन वाढते आणि पर्यायाने उच्च रक्तदाब वाढतो. त्यामुळे चहापानाऐवजी पाणी, सॅलड, फळे यावर भर द्यावा. सध्या चहा ४०० रुपये किलो आहे. त्यापेक्षा जेवण स्वस्त आहे असे डॉ. हेमंत जोशी यांनी सांगितले.'

टॅग्स :docterडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यSocialसामाजिक