शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पश्चिम विभागातील राज्ये म्हणजे विकासाचा बेंचमार्क; गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 12:19 IST

राज्यांमधील मुलांचे कुपोषण व मृत्यू ही गंभीर बाब आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.

पुणे : देशाच्या पश्चिम विभागातील राज्यांकडे अन्य विभागातील राज्ये विकासाचा बेंचमार्क म्हणून पाहतात. जगासोबतचा देशाचा निम्म्याहून जास्त व्यापार हा पश्चिम विभागातूनच होतो. तरीही, या राज्यांमधील मुलांचे कुपोषण व मृत्यू ही गंभीर बाब आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. यावर एकत्रितपणे उपाय शोधण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

पश्चिम विभागीय राज्यांची पुण्यात शनिवारी परिषद झाली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी शहा होते. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातचे मुख्यमंत्री, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री, काही मंत्री, प्रशासक, सचिव दर्जाचे अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. पश्चिम विभागातील राज्यांमधील समस्या, त्यावरचे उपाय, विकासासंबंधीच्या गोष्टी यावर परिषदेत मंथन झाले.

शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची संपूर्ण भारत हा विचार आता एक संस्कृती झाला आहे. अशा परिषदांमध्ये पूर्वी केवळ औपचारिकता होती. आता आम्ही ते विचार करण्याचे, उपाय शोधण्याचे व्यासपीठ बनवले आहे. औपचारिक संस्थांऐवजी बदल आणणारी संस्था, असे या परिषदांचे स्वरूप झाले आहे. संवाद, संपर्क आणि सहकार्यावर आधारित सर्वसमावेशक उपाय आणि सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट आता या परिषदांमधून साध्य करण्यात येत आहे.

सन २००४ ते २०१४ पर्यंत प्रादेशिक परिषदांच्या केवळ २५ बैठका झाल्या, तर २०१४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत कोरोनाची साथ असूनही एकूण ६१ बैठका झाल्या, जे मागील १० वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण १४० टक्के अधिक आहे, अशी माहिती शहा यांनी दिली.

प्रादेशिक परिषदांच्या बैठकीत समाविष्ट असलेल्या विषयांमध्ये १०० टक्के लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. देशभरातील प्रत्येक गावात दर ५ किलोमीटरवर बँक शाखा/पोस्ट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट जवळपास गाठले गेले. आता प्रत्येक गावाच्या ३ किलोमीटरच्या परिघात या सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

पश्चिम विभागातील राज्यांची गणना देशातील समृद्ध राज्यांमध्ये केली जाते, परंतु या राज्यातील मुले आणि नागरिक कुपोषण आणि स्टंटिंगचे बळी ठरत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. बालकांचे आणि नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला कुपोषणापासून मुक्ती मिळवायची आहे, असे आवाहन शहा यांनी पश्चिम विभागाचे सर्व मुख्यमंत्री, मंत्री आणि मुख्य सचिवांना केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAmit Shahअमित शाह