शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यातील कैद्यांची संख्या 'ओव्हरफ्लो'; कारागृहे गर्दीमुक्त कारण्यासाठी 'हा' उपक्रम राबवणार

By नम्रता फडणीस | Updated: August 22, 2022 18:36 IST

येरवडा कारागृहातून ४१८ कच्चे कैदी झाले मुक्त

पुणे : राज्यातील कारागृहे गर्दीमुक्त करण्यासाठी ‘रिलीज-यू टीआरसी @ ७५’ हा उपक्रम राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत येरवडा कारागृहामधून महिन्याभरात जवळपास ४१८ कच्च्या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.

‘ओव्हरफ्लो’ झाली असून, कच्च्या कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही कारागृहे गर्दीमुक्त व्हावी याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राज्यभरात ‘रिलीज-यू टी आर सी (अंडर ट्रायल रिव्हू कमिटी) @ ७५’ हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत येरवडा कारागृहामधून महिन्याभरात जवळपास 418 कच्च्या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. आगामी काळातही हा प्रकल्प येरवडा कारागृहामध्ये कार्यान्वित राहाणार आहे. त्यासाठी कैदयांची यादी तयार केली जात असून, प्रकल्पाच्या निकषात बसत असलेल्या कैद्यांची सुटका केली जाणार आहे.

आजमितीला राज्यातील येरवडा कारागृह हे सर्वाधिक क्षमतेचे कारागृह असून, या कारागृहातील कैद्यांची अधिकृत क्षमता २,३२३ (पुरुष) आणि १२६ (महिला) अशी एकूण २,४४९ एवढी आहे. सद्यस्थितीला येरवडा कारागृहात ६,७२३ पुरुष कैदी, २९८ महिला कैदी आणि ६ तृतीयपंथी असे एकूण ७ हजार २७ कैदी आहेत. या कारागृहातील कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा तिप्पटीने अधिक आहे. कारागृहात कच्चे कैदी अधिक दिवस राहू नयेत. विशेषत: तरुण कैदी जास्त वेळ कारागृहात न राहाता त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल या दृष्टीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत 16 जुलैला या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली . या प्रकल्पासाठी 16 निकष निश्चित करण्यात आले असून, यामध्ये प्रामुख्याने फौजदारी दंड संहिता (सीआरपीसी) कलम 436 आणि 436 अ चा अंतर्भाव करण्यात आला आहे. या निकषांमध्ये दि. 16 जुलै ते 13 आॅगस्टपर्यंत जे कैदी बसले. त्यांची सुटका करण्यात आली आहे.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, यू टी आर सी कमिटीचे प्रमुख ए.एस वाघमारे ( जिल्हा न्यायाधीश) , पुणे जिल्हा विधी प्राधिकरण सचिव मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा कारागृहात हा प्रकल्प राबविण्यात आला. 47 जणांच्या वकिलांच्या टीमने 28 दिवसात हे काम पार पाडले. कारागृह अधीक्षक राणी भोसले आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी पल्लवी कदम यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केले.

सर्वोच्च न्यायालयाने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालय आणि कारागृह प्रशासनाची मिटिंग घेऊन कैद्यांची सर्व माहिती संकलित करण्यात आली आणि त्यानंतर दर आठवड्याला मिटिंग घेऊन जास्तीत जास्त कैदयांची सुटका करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाची पूर्ण माहिती कारागृहातील रेडिओ सेंटर वरून देण्यात आली- मंगल कश्यप, सचिव पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

कैद्यांच्या सुटकेचे प्रमुख निकष

* जे कैदी 19 ते 21 वयोगटातील आहेत. ज्यांचा हा पहिलाच गुन्हा आहे आणि ज्यांना गुन्हयात 7 वर्षांपेक्षाही कमी शिक्षा झाली आहे. त्यातील 1/4 शिक्षा भोगली असेल तर ते पात्र ठरतील.* जे 65 वर्षांवरील कैदी आहेत. त्या कैद्यांना सोडण्यासाठी देखील विचार केला जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसYerwadaयेरवडाMaharashtraमहाराष्ट्रPrisonतुरुंग