शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शेतकऱ्यांची वीज बंद करण्याला राज्य शासन जबाबदार; विज पुर्ववत न केल्यास 'रास्ता रोको' करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:09 IST

गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.

कळस : शेतक-यांनी शेती पंपाची वीज खंडित केल्यामुळे महावितरण कंपनीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.  कळस ता.इंदापुर येथील दत्त मंदिरात आयोजित केलेल्या निषेध सभेत ते बोलत होते. या वेळी कर्मयोगी साखर कारखाण्याचे संचालक निवृत्ती गायकवाड, विजय खर्चे, रमेश खारतोडे, दादा वायाळ,धनंजय खारतोडे, सिताराम खारतोडे, पोपट सांगळे, सतीश ओमासे, विलास खारतोडे उपस्थित होते. 

खारतोडे म्हणाले, महावितरण कंपनीने दर तीन महिन्याला शेतकऱ्यांची वीज बंद करून त्यांचे नुकसान होण्याला राज्य शासन जबाबदार आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी कळस गावातील वीज आठ तासात वीज पुरवठा पुर्ववत करून द्यावा. अन्यथा या गावात त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. शेती मालाला नसलेले बाजार भाव उत्पादन खर्चात झालेली वाढ या मुळे शेती व्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामध्ये महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडित केल्याने पिके गेली आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. 

या वेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या बाबत महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले असून विज पुरवठा सुरळीत न झाल्यास कळस येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेmahavitaranमहावितरण