शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांची वीज बंद करण्याला राज्य शासन जबाबदार; विज पुर्ववत न केल्यास 'रास्ता रोको' करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:09 IST

गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.

कळस : शेतक-यांनी शेती पंपाची वीज खंडित केल्यामुळे महावितरण कंपनीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.  कळस ता.इंदापुर येथील दत्त मंदिरात आयोजित केलेल्या निषेध सभेत ते बोलत होते. या वेळी कर्मयोगी साखर कारखाण्याचे संचालक निवृत्ती गायकवाड, विजय खर्चे, रमेश खारतोडे, दादा वायाळ,धनंजय खारतोडे, सिताराम खारतोडे, पोपट सांगळे, सतीश ओमासे, विलास खारतोडे उपस्थित होते. 

खारतोडे म्हणाले, महावितरण कंपनीने दर तीन महिन्याला शेतकऱ्यांची वीज बंद करून त्यांचे नुकसान होण्याला राज्य शासन जबाबदार आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी कळस गावातील वीज आठ तासात वीज पुरवठा पुर्ववत करून द्यावा. अन्यथा या गावात त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. शेती मालाला नसलेले बाजार भाव उत्पादन खर्चात झालेली वाढ या मुळे शेती व्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामध्ये महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडित केल्याने पिके गेली आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. 

या वेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या बाबत महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले असून विज पुरवठा सुरळीत न झाल्यास कळस येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेmahavitaranमहावितरण