शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शेतकऱ्यांची वीज बंद करण्याला राज्य शासन जबाबदार; विज पुर्ववत न केल्यास 'रास्ता रोको' करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:09 IST

गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.

कळस : शेतक-यांनी शेती पंपाची वीज खंडित केल्यामुळे महावितरण कंपनीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.  कळस ता.इंदापुर येथील दत्त मंदिरात आयोजित केलेल्या निषेध सभेत ते बोलत होते. या वेळी कर्मयोगी साखर कारखाण्याचे संचालक निवृत्ती गायकवाड, विजय खर्चे, रमेश खारतोडे, दादा वायाळ,धनंजय खारतोडे, सिताराम खारतोडे, पोपट सांगळे, सतीश ओमासे, विलास खारतोडे उपस्थित होते. 

खारतोडे म्हणाले, महावितरण कंपनीने दर तीन महिन्याला शेतकऱ्यांची वीज बंद करून त्यांचे नुकसान होण्याला राज्य शासन जबाबदार आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी कळस गावातील वीज आठ तासात वीज पुरवठा पुर्ववत करून द्यावा. अन्यथा या गावात त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. शेती मालाला नसलेले बाजार भाव उत्पादन खर्चात झालेली वाढ या मुळे शेती व्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामध्ये महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडित केल्याने पिके गेली आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. 

या वेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या बाबत महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले असून विज पुरवठा सुरळीत न झाल्यास कळस येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेmahavitaranमहावितरण