शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

श्रीरंग बारणे, आढळराव पाटील शिंदे गटात; पिंपरीत भाजप आमदारांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:33 IST

शिवसेनेतील बंडखोरांच्या भाजप सलगीने लक्ष्मण जगताप, महेश लांडगे समर्थकांत नाराजी

पिंपरी : माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपशी सलगी करून ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पिंपरी - चिंचवड शहरातील खासदार श्रीरंग बारणे व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटातील या आजी आणि माजी खासदारांच्या भाजपशी होणाऱ्या नवीन सलगीने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. मावळ व शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व माजी मंत्री बाळा भेगडे समर्थकांमध्ये नवीन इनकमिंगने नाराजी पसरली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर २० जूनला फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील आमदारांचा मोठा गट बाहेर पडला. त्यांनी भाजपला पाठिंबा देऊन नवीन सरकार स्थापन केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या १२ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. मावळ व शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांचे कार्यक्षेत्र पिंपरी, चिंचवड व भोसरीचे आहे. त्यामुळे या आजी - माजी खासदारांच्या बंडखोरीचे पडसाद पिंपरी - चिंचवडच्या राजकीय समीकरण बदलावर दिसणार आहेत.

भाजपची कोंडी

खरे तर शिवसेना आणि भाजपातील युती फिसकटल्यानंतर मावळ व शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २०२४साठी भाजपने स्वतंत्रपणे बांधणी सुरू केली होती. शिरूरमधून भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी, तर मावळमधून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तयारी सुरू केली. याशिवाय मावळमधून बाळा भेगडे व प्रशांत ठाकूर यांच्याही नावाची चर्चा भाजपच्या गोटातून होती. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीत शिंदे गट भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या जागा त्यांनाच मिळू शकतात. त्यामुळे खासदारकीसाठी भाजपतील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही नाराजी आणि बंडखोरांना थोपविण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ