शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

''द्वेष छोडो देश जोडो'' म्हणत तरुणांची नागपूर ते पुणे सायकल यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 15:56 IST

नागपूर ते पुणे सायकल यात्रा काढत तरुणांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वाचा संदेश दिला.

पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून गांधी स्मारक निधीच्या पाच तरुणांनी नागपूर ते पुणे सायकल यात्रा काढत महात्मा गांधी यांच्या अहिंसेचा संदेश दिला. द्वेष छोटो देश जोडो हा या तरुणांच्या सायकल यात्रेचे घोषवाक्य होते. नागपूर येथे सर्वाधिक गुन्हे घडत असल्याने नागपूर पासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. पुण्यातील कोथरुड भागातील गांधीभवन येथे या यात्रेचा शेवट करण्यात आला. 

अहिंसेच्या जोरावर महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वच्छता, स्वावलंबन, अहिंसा या तत्त्वांचा गांधीजींना त्यांच्या आयुष्यात अंगीकार केला. आजही महात्मा गांधी करोडो भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. गांधीजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील विविध भागातील पाच तरुणांनी नागपूर ते पुणे अशी सायकल यात्रा काढली. या पंधरा दिवसाच्या प्रवासामध्ये त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी थांबत गांधीजींच्या अहिंसा या तत्त्वाचा प्रचार केला. नागपूर मध्ये राज्यातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली असल्याने नागपूरमधूनच या यात्रेची सुरुवात करण्याचा तरुणांनी निर्णय घेतला. 

याबाबत बोलताना महेश पाटील म्हणाला, महात्मा गांधींनी आपल्या देशाला अहिंसेचा मार्ग दाखवला. अहिंसेच्या मार्गावर चालत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देश फिरुन त्यांनी भारतीयांना एक केले. सध्या मात्र गांधीजींबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. दोन धर्मांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून आपल्याला गांधीजींचे विचारच बाहेर काढू शकतील. शांतीला पर्याय नाही शांती हाच मार्ग आहे या विचाराचा प्रसार करत 15 सप्टेंबरला आम्ही या सायकल यात्रेला सुरुवात केली. विविध खेड्यांमध्ये जाऊन आम्ही नागरिकांशी संवाद साधला. गांधींचे विचार नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न केला. तसेच शाळांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन केले, त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूरCyclingसायकलिंग