शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

''द्वेष छोडो देश जोडो'' म्हणत तरुणांची नागपूर ते पुणे सायकल यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 15:56 IST

नागपूर ते पुणे सायकल यात्रा काढत तरुणांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वाचा संदेश दिला.

पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून गांधी स्मारक निधीच्या पाच तरुणांनी नागपूर ते पुणे सायकल यात्रा काढत महात्मा गांधी यांच्या अहिंसेचा संदेश दिला. द्वेष छोटो देश जोडो हा या तरुणांच्या सायकल यात्रेचे घोषवाक्य होते. नागपूर येथे सर्वाधिक गुन्हे घडत असल्याने नागपूर पासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. पुण्यातील कोथरुड भागातील गांधीभवन येथे या यात्रेचा शेवट करण्यात आला. 

अहिंसेच्या जोरावर महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वच्छता, स्वावलंबन, अहिंसा या तत्त्वांचा गांधीजींना त्यांच्या आयुष्यात अंगीकार केला. आजही महात्मा गांधी करोडो भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. गांधीजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील विविध भागातील पाच तरुणांनी नागपूर ते पुणे अशी सायकल यात्रा काढली. या पंधरा दिवसाच्या प्रवासामध्ये त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी थांबत गांधीजींच्या अहिंसा या तत्त्वाचा प्रचार केला. नागपूर मध्ये राज्यातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली असल्याने नागपूरमधूनच या यात्रेची सुरुवात करण्याचा तरुणांनी निर्णय घेतला. 

याबाबत बोलताना महेश पाटील म्हणाला, महात्मा गांधींनी आपल्या देशाला अहिंसेचा मार्ग दाखवला. अहिंसेच्या मार्गावर चालत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देश फिरुन त्यांनी भारतीयांना एक केले. सध्या मात्र गांधीजींबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. दोन धर्मांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून आपल्याला गांधीजींचे विचारच बाहेर काढू शकतील. शांतीला पर्याय नाही शांती हाच मार्ग आहे या विचाराचा प्रसार करत 15 सप्टेंबरला आम्ही या सायकल यात्रेला सुरुवात केली. विविध खेड्यांमध्ये जाऊन आम्ही नागरिकांशी संवाद साधला. गांधींचे विचार नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न केला. तसेच शाळांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन केले, त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूरCyclingसायकलिंग