शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

''द्वेष छोडो देश जोडो'' म्हणत तरुणांची नागपूर ते पुणे सायकल यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 15:56 IST

नागपूर ते पुणे सायकल यात्रा काढत तरुणांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वाचा संदेश दिला.

पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून गांधी स्मारक निधीच्या पाच तरुणांनी नागपूर ते पुणे सायकल यात्रा काढत महात्मा गांधी यांच्या अहिंसेचा संदेश दिला. द्वेष छोटो देश जोडो हा या तरुणांच्या सायकल यात्रेचे घोषवाक्य होते. नागपूर येथे सर्वाधिक गुन्हे घडत असल्याने नागपूर पासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. पुण्यातील कोथरुड भागातील गांधीभवन येथे या यात्रेचा शेवट करण्यात आला. 

अहिंसेच्या जोरावर महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वच्छता, स्वावलंबन, अहिंसा या तत्त्वांचा गांधीजींना त्यांच्या आयुष्यात अंगीकार केला. आजही महात्मा गांधी करोडो भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. गांधीजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील विविध भागातील पाच तरुणांनी नागपूर ते पुणे अशी सायकल यात्रा काढली. या पंधरा दिवसाच्या प्रवासामध्ये त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी थांबत गांधीजींच्या अहिंसा या तत्त्वाचा प्रचार केला. नागपूर मध्ये राज्यातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली असल्याने नागपूरमधूनच या यात्रेची सुरुवात करण्याचा तरुणांनी निर्णय घेतला. 

याबाबत बोलताना महेश पाटील म्हणाला, महात्मा गांधींनी आपल्या देशाला अहिंसेचा मार्ग दाखवला. अहिंसेच्या मार्गावर चालत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देश फिरुन त्यांनी भारतीयांना एक केले. सध्या मात्र गांधीजींबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. दोन धर्मांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून आपल्याला गांधीजींचे विचारच बाहेर काढू शकतील. शांतीला पर्याय नाही शांती हाच मार्ग आहे या विचाराचा प्रसार करत 15 सप्टेंबरला आम्ही या सायकल यात्रेला सुरुवात केली. विविध खेड्यांमध्ये जाऊन आम्ही नागरिकांशी संवाद साधला. गांधींचे विचार नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न केला. तसेच शाळांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन केले, त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूरCyclingसायकलिंग