शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

विजापूर येथील अपघातग्रस्त कबड्डीपट्टूंच्या मदतीसाठी क्रीडाप्रेमी, मित्र परिवार सरसावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 14:40 IST

कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडुंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे बुधवारी(दि १७) पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला होता.

बारामती : कर्नाटक राज्यातील विजापूर येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले इंदापूर तालुक्यातील दोन खेळाडू जागेवर मृत झाले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या वैभव मोहिते व गणेश कोळी यांच्यावर विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू  होते. पुढील चांगल्या उपचारासाठी या दोघांना पुणे येथील खासगी रूग्णालयामध्ये शुक्रवारी (दि. १९) रात्री उशिरा दाखल करण्यात येणार आहे. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कळंब येथील कब्बडीप्रेमी व खेळाडूंनी मदतीसाठी आवाहन केले आहे.

कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडुंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे बुधवारी(दि १७) पहाटे  ५ च्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातामध्ये महादेव आवटे (रा. भवानीनगर), सोहेल सय्यद (रा. कळंब ) या दोघांचा मृत्यू झाला. कबड्डी खेळाच्या प्रेमापोटी हे खेळाडू अगदी शेतमजुरी करून उपजीविका करत राष्ट्रीय पातळीपर्यंत नावाजले गेले होते. या अपघातामधून सुदैवाने बचावलेल्या मात्र गंभीर जखमी झालेल्या वैभव मोहिते व गणेश कोळी यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यासाठी पुणे येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. वैभवचे वडील बापू मोहिते व गणेशचे वडील तानाजी कोळी यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. उपचाराचा खर्च देखील मोठा असल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहे. या सर्वच खेळाडूंनी अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

येथील महाराणा कबड्डी संघ राज्यात प्रसिध्द आहे.येथे कबड्डीसाठी अनेक विद्यार्थी येतात. या संघात अनेक राष्ट्रीय कबड्डीपट्टू घडले आहेत. अनेकजण कबड्डीच्या बळावर पोलीस भरती देखील झाले आहेत. अपघाताला तीन दिवस उलटले तरी कळंब परिसरावर अद्याप शोककळा आहे. या अपघातामध्ये एकूण नऊ खेळाडू होते. यातील दोघांचा मृत्यू झाला. तर किरकोळ जखमी असणाऱ्या सिद्धार्थ कांबळे, संदीप सुर्यवंशी, अविष्कार कोळी, पृथ्वीराज शिंदे,समीर शेख यांना इंदापूर येथील खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या खेळाडूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय कब्बडीपट्टू सुलतान डांगे, प्रशिक्षक अकबर शेख व त्याचा मित्र परिवार सरसावला आहे. कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील माजी विद्यार्थी देखील मदतीसाठी पुढे येत असून समाज माध्यमातून मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे.

किरकोळ जखमी असणाऱ्या खेळाडूंना आम्ही इंदापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. त्याचा जवळपास साडेतीन ते चार लाख रूपये खर्च झाला आहे. गंभीर जखमी असणाऱ्या वैभव व गणेश यांच्यावर विजापूरच्या हॉस्पिटलमध्ये पुढील चांगले उपचार मिळणे कठिण आहे. तसेच अंतर जास्त असल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे पुणे येथील रूग्णालयात दाखल केले आहे.  आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. वैभव व गणेश सध्या बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने चांगले उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मदतीसाठी आवाहन केले आहे.- सुलतान डांगे, राष्ट्रीय कब्बडीपट्टू-------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीAccidentअपघातhospitalहॉस्पिटलIndapurइंदापूर