शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

पिचकाऱ्या 'पंटर्स'मुळे शहराच्या साैंदर्यावर डाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 17:28 IST

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुण्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असताना काही समाजकंटक त्यावर बाेळा फिरवत आहेत.

- राहुल गायकवाड पुणे : स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहराने प्रथम क्रमांक मिळवावा यासाठी पुणे महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई असाे की दुभाजकावर करण्यात आलेली रंगरंगाेटी. सार्वजनिक भिंतींवर पुण्यातील महत्त्वाच्या वास्तूंची चित्रे सुद्धा रेखाटण्यात आली. अशी सगळी पाऊले महापालिककेडून उचलली जात असताना काही समाजकंटक यावर बाेळा फिरवत आहेत. काही मिनिटापूर्वी रंगवलेले दुभाजक पुन्हा पानपिचकाऱ्यांनी लाल रंगाने रंगविण्याची ''किमया'' या समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शहर जरी स्वच्छ हाेत असलं तरी ''अस्वच्छ'' मने ''स्वच्छ'' हाेणार का असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. 

गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराचा क्रमांक बराच मागे गेल्याने यंदा विशेष माेहिम पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात आली. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर तसेच थुंकणाऱ्यांवर दंडरुपी कारवाई करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्ते स्वच्छ करुन घेतले. त्याचबराेबर दुभाजक, सार्वजनिक भिंती यांच्यावर रंगरंगाेटी करण्यात आली. शहरातील अनेक भिंतींवर पुण्याचे चित्ररुपी दर्शन रेखाटण्यात आले हाेते. तर दुसरीकडे दुभाजक पुन्हा एकदा रंगविण्यात आले. परंतु काही समाजकंटकांनी या चित्रांवर, तसेच दुभाजकांवर थुंकून ते लाल करुन टाकले. त्यामुळे रंगकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच महापालिकेची मेहनत वाया गेल्याचे चित्र आहे. 

चित्ररुपी पुणे सार्वजनिक भिंतींवर रेखाटणारे दीपक चांदणे म्हणाले, आम्ही चित्र रेखाटल्यानंतर तसेच दुभाजक रंगविल्यानंतर काही क्षणातच नागरिकांकडून त्यावर थुंकले जाते. अनेकदा तर लाेक आम्ही काम करत असताना आमच्या अंगावर देखील थुंकले आहेत. या सर्व प्रकारामुळे मनाला वेदना हाेतात. आपली कलाकृती काही मिनिटात खराब हाेताना पाहताना अतिव दुःख हाेते. नागरिकांनी भिंतींवर, दुभाजकांवर न थुंकल्यास शहर सुंदर राहण्यास मदत हाेणार आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणासाठी विविध उपक्रम महापालिकेकडून राबविण्यात आले. अनेकदा नागरिक रंगविलेल्या भिंतींवर, दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारतात. ही अत्यंत चुकीची गाेष्ट आहे. शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. लाेकांना पालिकेकडून दंड केला जाताे परंतु लाेकांमध्ये जागृती हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शहराचे आराेग्य चांगले राखण्यासाठी तसेच शहराला सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानHealthआरोग्य