शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पालक जिंकले ! अखेर एमअायटीकडून जाचक अटी मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 18:00 IST

पुण्यातील एमआयटीच्या विश्वशांती गुरुकूल प्रशासनाने अखेर पालकांच्या संतापापुढे गुडघे टेकले

पुण्यातील माईर्स एमअायटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेने विद्यार्थी व पालकांवर लादलेल्या अटींवर चहुबाजूंनी टीकेची झाेड उठल्यानंतर शाळेकडून लादण्यात अालेल्या तुघलकी अटी अाता मागे घेण्यात अाल्या अाहेत. शाळेच्या प्राचार्यांनी एका निवेदनाद्वारे या अटी मागे घेत असल्याचे सांगितले अाहे. 

पुण्यातील माईर्स एमअायटीच्या विश्वशांती गुरुकुल शाळेने विद्यार्थी व पालकांवर अनेक तुघलकी अटी व नियम लादले हाेते. या विराेधात पालकांमध्ये संतापाची लाट उसळली हाेती. चिडलेल्या पालकांनी बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घालत शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली. एमअायटी शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी व पालकांसाठी डायरीमार्फत एक नियमावली जाहीर केली हाेती. ज्यात मुलींची अंतर्वस्त्र पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची असावीत,लिपस्टिक, लिप ग्लास किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स लावायचे नाही, कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाही, शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी आणि पालक, शाळेत किंवा शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही, विद्यार्थी आणि पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करु नये अश्या अटींचा त्यात समावेश हाेता. तसेच या अटींचा भंग केल्यास फाैजदारी कारवाई करण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र पालकांकडून लिहून घेण्यास सांगण्यात अाले हाेते.  माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुलच्या अंतर्गत येणाऱ्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश शाळा, श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा आणि एमआयटी पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी डायरीमार्फत ही नियमावली लादण्यात अाली हाेती. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून हे नियम तयार केल्याचं शाळेकडून सांगण्यात अालं हाेतं. 

दरम्यान शिक्षण मंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून शाळेची चाैकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बाेलताना सांगितले. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शाळेच्या या जाचक अटींचा निषेध करुन गुरुवारी शाळेत अांदाेलन करुन या अटी मागे घेण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला निवेदन दिले. शाळा प्रशासनाने विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या गणवेशासंदर्भात डायरीमध्ये दिलेल्या सूचना या काेणाच्याही वैयक्तिक अथवा सामूहिक भावना दुखावण्याचा हेतू शाळा प्रशासनाचा नव्हता व नाही. याबाबत शाळेच्या प्रशासनाकडून सदैव विद्यार्थी केंद्रीत विचार करुन संबंधीत डायरी व सूचना मागे घेण्यात येत अाहेत असे शाळाप्रशासनाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हंटले अाहे. 

टॅग्स :mitएमआयटीStudentविद्यार्थीPuneपुणे