शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

भावा-बहिणीच्या नात्यातील सलोख्यासाठी खास लोकअदालत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 02:17 IST

उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांचा निर्णय

राजगुरुनगर : आर्थिक वादामुळे अनेक ठिकाणी भावा-बहिणीची नाती मोडकळीस आली आहेत. एकमेकांचे तोंडही न पाहण्याइतपत कटुता निर्माण झाली आहे. अशावेळी भावा-बहिणीचे नाते टिकविण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून खास लोकअदालत भरविण्यात येणार आहे.औद्योगिकीकरणामुळे खेड तालुक्यातील जमिनींना सोन्याचा बाजारभाव आला आहे. अनपेक्षितपणे मिळणाऱ्या मोठ्या पैशामुळे अनेक घरांमध्ये जागा वाटपावरून कौटुंबिक वाद निर्माण झाले. भावा-बहिणीच्या नात्यात कटुता निर्माण झाली. रक्षाबंधन व भाऊबीज या पवित्र सणांवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. यामुळे सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून खेड बार असोसिएशनच्या सहकार्याने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) अशा खास ६८ दाव्यांसाठी लोकअदालतीचे आयोजन प्रांत कार्यालयात करण्यात आले आहे.यासाठी संबंधित गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांना या लोकांचे समुपदेशन करण्यास सांगितले आहे, अशी माहिती प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. खेड तालुक्यातील ३७ गावांतील १०७ बेघर भूमिहीन नागरिकांना त्याच गावातील गायरान जमीन लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आयुष प्रसाद यांनी दिली. यासंदर्भात, येत्या गुरुवारी (दि. १३) प्रांत कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.प्रत्येक बेघर लाभार्थ्याला अर्धा गुंठा जमीन देण्यात येईल. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खेड तालुक्यातील यापूर्वीच्या प्रस्तावित ८३ लाभार्थ्यांना सोमवारी (दि. १०) जमीन वाटप केले आहे. पालकमंत्री पाणंद योजनेसाठी खेड तालुक्यातून एकही प्रस्ताव दाखल झाला नाही. नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गटविकास अधिकारी यांच्याकडे गुरुवारपर्यंत (दि. १३) प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले आहे.७६ दावेकऱ्यांना कडक सूचनाप्रांत कार्यालयात २८०० महसुली दावे प्रलंबित होते. त्यापैकी १५०० दावे निकाली काढले असून, ५०० दावे अन्यत्र वर्ग करण्यात आले आहेत.उर्वरित ८०० दाव्यांपैकी ७६ दावेकरी अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा फिरकले नाही, अशा नागरिकांना अंतिम सूचना देण्यात आली असून १९ डिसेंबरपर्यंत त्यांनी संपर्क न केल्यास ते दावे निकाली काढण्यात येतील, असा इशारा प्रसाद यांनी दिला.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे