शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

चीनशी लढण्यासाठी स्पेशल फ्रंटियर फोर्स; छुप्या कारवायांसाठी माहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 06:50 IST

२९-३० ऑगस्टला अक्साई चीन प्रदेशातील महत्त्वाच्या प्रदेशांवर मिळविला ताबा

- निनाद देशमुख पुणे : पाकिस्तानने १९८४ मध्ये एका क्षुल्लक अशा केलेल्या चुकीमुळे सावध झालेल्या भारताने रणनीतीदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सियाचीनवर ताबा मिळविला होता. यामुळे पाकिस्तानला हात चोळत बसावे लागले होते. तसाच काहीसा प्रकार आता भारत-चीन सीमावादात पेंगाँग सरोवरालगतच्या दक्षिण शिखरांबाबत उघडकीस आला आहे. भारताने अनपेक्षितपणे हालचाली करीत २९-३० ऑगस्टच्या रात्री अक्साई चीनमधील महत्त्वाचा भाग स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या साह्याने ताब्यात घेत तिथे भारतीय तिरंगा फडकविला. या कारवाईमुळे चिनी लष्कराचे तिबेटी पठारावरील तळ भारताच्या टप्यात आले आहेत.

चीनला शह देण्यासाठीच १९६२ च्या युद्धानंतर तेव्हाचे आयबीचे संस्थापक डायेक्टर भोलानाथ मलिक तसेच दुसऱ्या महायुद्धातील सैनिक आणि ओडिशाचे मुख्यमंत्री राहिलेले बिजू पटनायक यांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या फोर्सची स्थापना केली होती. भविष्यात भारताशी चीनचे युद्ध झाले तर चीनच्या क्षेत्रात घुसून वेगाने कारवाया करणे हे या फोर्सचे उद्दिष्ट होते. या संस्थेचे पहिले प्रमुख मेजर जनरल सुजानसिंग उबन हे होते.

सुजानसिंग उबन दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याच्या २२ माऊंटन डिव्हिजनचे कमांडन्ट होते. यामुळे या दलाला सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंट २२ असे संबोधले जात होते. चीनला तोंड देण्यासाठी सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने १९५०च्या दशकात भारताची तेव्हाची गुप्तचर संघटना इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) मदतीने तिबेटी बंडखोरांना प्रशिक्षित केले. सुरुवातीला नेपाळमध्ये त्यांना प्रशिक्षित करण्यात आले. चीनने तिबेट गिळंकृत केला, तेव्हा याच बंडखोरांनी १४ वे धर्मगुरू दलाई लामा यांना भारतात आणले. मोठ्या प्रमाणात तिबेटी नागरिकही भारतात आलेहोते.या फोर्समध्ये प्रामुख्याने लडाख, सिक्कीम येथील नागरिक तसेच भारतात आश्रय घेतलेल्या तिबेटी नागरिकांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पर्वतरांगामध्ये लढण्याचा अनुभव असल्यानेच त्यांना या फोर्समध्ये घेण्यात आले. आता गोरखा आणि बॉन वंशीय नागरिकांचाही या दलात समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला आयबीच्या अखत्यारित येत असलेली ही संस्था आता भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनॅलिसीस विंग (रॉ) यांच्या अखत्यारित काम करते. याचे मुख्यालय उत्तराखंड येथील छाकारता येथे आहे. सुरुवातीला सीआयए आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनी एसएसएफमधील जवानांना प्रशिक्षण दिले.

कुठल्याही प्रकारच्या कारवाया करण्यास सक्षम

स्पेशल फ्रंटियर फोर्स अतिशय गुप्तपणे लष्करी कारवाया पार पाडते. लष्करासारखे कार्य असले, तरी ही संस्था लष्कराच्या आधिपत्याखाली येत नाही. ‘रॉ’च्या आधिपत्याखाली ही फोर्स कार्य करते. डायरेक्टर जनरल सिक्युरिटी यांच्या माध्यमातून ही फोर्स थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करीत असते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndiaभारत