शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

वारी अखंड ऊर्जेचा स्रोत

By admin | Updated: June 19, 2017 05:20 IST

वर्षानुवर्षे अखंडपणे ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा

पुणे : वर्षानुवर्षे अखंडपणे ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा आणि आता नातू अशी वारीत सहभागी होण्याची परंपरा जपत भागवत धर्माची पताका उंचाविण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. आषाढी वारी ही अखंड ऊर्जेचा स्रोत असून त्यातून जगण्यासाठी खूप काही मिळत असल्याची भावना वारकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता असते, असे वारकरी कधीच ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण आम्हाला विठूरायाला भेटायचे असते... आमच्या मधले काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो, या वारीतच असे मला वाटते. गेली २२ वर्षे विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहे. माऊली भेटीची ओढ लागली असल्यामुळे आमची तहान, भूकदेखील हरते. फक्त हरिनामाचा गजर करत विठूच्या भेटीस चालतो. - भीमराव करपे (वय ६०)आम्हाला जशी सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस आहे, तशीच वरुणराजाच्या दर्शनाचीही आस असून, महाराष्ट्राला दुष्काळाच्या सावटातून मुक्त कर, असे साकडे विठ्ठलाला घालणार आहोत. मराठवाड्यात चांगला पाऊस होऊ दे आणि आमची सगळी संकटे टळू दे यासाठी आम्ही देवाला विनवणी करायला पंढरपूरला चाललो आहोत. आम्ही १५ वर्षे झाली वारीला जात आहोत. दुथडी भरून वाहणारी नीरा नदी आणि माउलींच्या सान्निध्यात होत असलेले पवित्र तीर्थस्नान हा आमच्यासाठी आनंदाचा भाग आहे. संतांबरोबर तीर्थस्नानाचे भाग्य आहेच; पण माउलींच्या पादुका हातात घेउन नदीत स्नान करतानाचा क्षण आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. - अक्काबाई गवारे मी वयाच्या १० व्या वर्षापासून वारीमध्ये सहभागी आहे. गेली सहा वर्षे मी सातत्याने वारकरी संप्रदायसोबत विठूरायाच्या दर्शनास जातो. माझे सर्व कुटुंबच या वारीमध्ये सहभागी असते. आम्ही दिवसा लवकर उठून शुचिर्भूत होऊन अभंग म्हणत म्हणत पंढरीच्या वाटेवरती चालू लागतो, दुपारनंतर पोटपूजा आटोपून रस्त्याच्या कडच्या झाडाखाली थोडी विश्रांती घ्यावयाची व पुन्हा चालणे सुरू करायचे. एखाद्या मोकळ्या मैदानाच्या जागी सगळे भक्तगण गोळा होतात आणि उभे किंवा वतुर्ळाकार रिंगण तयार केले जाते. तसेच पालखी, ध्वज हे मध्यभागी ठेवून भक्तगण त्याभोवती वतुर्ळाकारात उभे राहतात किंवा दोन समांतर ओळीत उभे राहातो. तेव्हा त्या रिंगणात रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. त्यानंतर अंधार पडला की जवळपासच्या गावी किंवा वस्तीवर मुक्काम करायचा, असे आम्हा वारकऱ्यांच्या प्रवासाचे स्वरूप असते. - ग्यानोबा पांचाळ (वय १६)पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी, या नामघोषाने आमच्या वारीला सुरुवात होते. यामुळे सगळे वातावरण भारून जाते. चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी दाखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका "या समर्पक ओवीच्या अविर्भावात आमच्या चेहऱ्यावर प्रवासाचा शीण जराही उमटू न देता आम्ही सारे वारकरी दिंडीबरोबर चालत रहातो. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्यांचा पंढरपूरला पायी चालत जाण्याचा मार्ग भिन्न आहे. परंतु पुण्यात मात्र या दोन्ही पालख्या एकाच दिवशी येतात आणि पुणे शहरही विठूनामाच्या गजराने दुमदुमून निघते. तसेच या पालखीसोबत आम्ही पुढे पंढरपूरच्या मार्गी लागतो. गावोगावी वरून येणाऱ्या आमच्या या वारकरी दिंड्यांचे त्या त्या गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांकडून भव्य स्वागत होते. - बाळू जाधव