शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

घटना घडल्यावरच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST

झोपडपट्ट्यांमध्ये चोऱ्यामाऱ्या किंवा दादागिरी करा, ही जी संस्कृती वाढली आहे. त्याचा महिलांवरील वाढत्या बलात्काराच्या घटना आणि त्यांच्या असुरक्षिततेशी जवळचा ...

झोपडपट्ट्यांमध्ये चोऱ्यामाऱ्या किंवा दादागिरी करा, ही जी संस्कृती वाढली आहे. त्याचा महिलांवरील वाढत्या बलात्काराच्या घटना आणि त्यांच्या असुरक्षिततेशी जवळचा संबंध आहे. कोरोनाच्या वॉर्डमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला, याला कोणती संस्कृती म्हणायची? एकीकडे जात, धर्म, संस्कृतीचा अभिमान बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला जात-धर्मांमध्ये पवित्रता हवी याकरिता प्रेमावर बंधने टाकायची. विकृत पद्धतीचे पुरुषी रचनांचे हे आविष्कार आहेत. शिक्षण, आरोग्य विनामूल्य मिळण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षिततेची हमी मिळायला हवी. शाश्वत उत्पन्न नसणं म्हणजे भिकाऱ्यासारखं सरकारच्या पैशावर अवलंबून राहाणं, आता तर बेरोजगारीचा दर वाढला आहे. या सर्वांची साखळी वैफल्यग्रस्तेशी निगडित आहे. यातूनच मग मुलगी दिसली की बलात्कार करण्याचे प्रकार घडतात. या सर्व कड्या एकमेकांमध्ये जोडलेल्या आहेत. या कडा जर तोडायच्या असतील, तर आपल्याला मूलगामी मनुष्यत्वाच्या अधिकारावर काम केलं पाहिजे. बलात्काऱ्यांना कडक शिक्षा करा म्हटलं म्हणजे महिलेला न्याय देतो, असे होत नाही. महिला जिवंत राहिली तरी तिला ही घटना विसरू दिली जात नाही. न्यायालयात तिला उभी करून वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यातून ती कधीच सावरू शकत नाही. तिचे पुनर्वसन होण्यासाठी ती पीडिता सांगण्यासाठी पुढे येत नाही. कारण ९५ टक्के बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडूनच केले जातात. महिलेच्या पाठीमागे उभे राहायला हवं. पण तसं होत नाही. आपण महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो. पण ५० टक्के महिलांना कोणतीही सुरक्षितता नाही, घरात सन्मान नाही. ही गुंतागुंत समाजाच्या दुरवस्थेशी जोडली गेली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार हा तिरस्करणीय आहे. याचा मी पूर्णपणे निषेध करते. सर्वांनीच केले पाहिजे. पण एकाच घटनेवर चर्चा होते. त्याच्या लिंक आहेत. हाथरस किंवा इतर बलात्कारांचे काय झाले? संसदेमध्येच आरोपी बसलेले आहेत. कितीतरी वेळेला राजकीय पक्षांनी बलात्काऱ्यांना पाठीशी घातले जाते. या घटना घडल्यावर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो. प्रत्येकाला आत्मसन्मान मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत!

--------------