शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

" मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काही व्यक्तींना प्रसिद्धीच मिळत नाही.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 18:24 IST

चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना जोरदार टोला..

पुणे : मोठ्या व्यक्तींवर टीका केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धीच मिळत नाही. अशा व्यक्तींना प्रसार माध्यमांनी समजून सांगायला हवे की, टीका केल्याखेरीज देखील आम्ही तुम्हाला कव्हरेज देऊ.  मग ते कदाचित टीका करणे बंद करतील अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना नामोल्लेख न करता सणसणीत टोला लगावला. 

 पुण्यात भाजपच्या एका कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींवर विविध मुद्दे उपस्थित करून टीका करताना दिसतात. त्याचाच संदर्भ घेत पाटील यांनी रोहित पवारांना लक्ष केले. तसेच यावेळी पाटील यांनी राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर देखील ताशेरे ओढले. 

पाटील म्हणाले, राज्य सरकार कोरोनाचे कारण पुढे करून अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकते? मान्य आहे , सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज खूप अस्वस्थ होता. तसेच या समाजातील तरूण-तरूणी यांच्या भवितव्याबद्दल चिंता सुद्धा आहे. पण या समाजाकडून परीक्षेला जो विरोध झाला, हा विरोध जर तुम्हाला स्वीकारार्ह होता तर सरकारने परीक्षा पुढे ढकलायचा निर्णय फार अगोदरच घेणे गरजेचे होते. पण तसे न करता  ठाकरे सरकारकडून एमपीएससीसारख्या महत्वाच्या परीक्षेबाबत असा वेळेवर निर्णय घेतला जाणे अतिशय चुकीचे आहे. 

पुढे ते म्हणाले, राज्य सरकार दिशाहीन आहे. या सरकारमध्ये निर्णयाची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीतच बसले आहेत. या घडीला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन एक महिना उलटला आहे. आता जर तुम्ही तुमचे वकील सर्वोच्च न्यायालयात पाठवून तुम्ही विनंती करत आहात. मग महिन्याभराच्या कालावधीत राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले गेले नाही का? मराठा समाजातील तरूण-तरूणींना सर्वोच्च न्यायालयात जाऊन व स्थगिती उठून न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित करून पाटील म्हणाले की ,महाविकास आघाडी सरकार असो किंवा मुख्यमंत्री यांनी या परिस्थितीत खरं बोलायला हवे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात महिविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेत येईल यावर  चंद्रकांत पाटील भाष्य करताना म्हणाले, नड्डा यांचे ते सत्तातंराचे भाकीत आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून नसून जेव्हा निवडणुका होतील तेंव्हा साठी आहे.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलRohit Pawarरोहित पवारPoliticsराजकारण