शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

" मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काही व्यक्तींना प्रसिद्धीच मिळत नाही.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 18:24 IST

चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना जोरदार टोला..

पुणे : मोठ्या व्यक्तींवर टीका केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धीच मिळत नाही. अशा व्यक्तींना प्रसार माध्यमांनी समजून सांगायला हवे की, टीका केल्याखेरीज देखील आम्ही तुम्हाला कव्हरेज देऊ.  मग ते कदाचित टीका करणे बंद करतील अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना नामोल्लेख न करता सणसणीत टोला लगावला. 

 पुण्यात भाजपच्या एका कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींवर विविध मुद्दे उपस्थित करून टीका करताना दिसतात. त्याचाच संदर्भ घेत पाटील यांनी रोहित पवारांना लक्ष केले. तसेच यावेळी पाटील यांनी राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर देखील ताशेरे ओढले. 

पाटील म्हणाले, राज्य सरकार कोरोनाचे कारण पुढे करून अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकते? मान्य आहे , सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज खूप अस्वस्थ होता. तसेच या समाजातील तरूण-तरूणी यांच्या भवितव्याबद्दल चिंता सुद्धा आहे. पण या समाजाकडून परीक्षेला जो विरोध झाला, हा विरोध जर तुम्हाला स्वीकारार्ह होता तर सरकारने परीक्षा पुढे ढकलायचा निर्णय फार अगोदरच घेणे गरजेचे होते. पण तसे न करता  ठाकरे सरकारकडून एमपीएससीसारख्या महत्वाच्या परीक्षेबाबत असा वेळेवर निर्णय घेतला जाणे अतिशय चुकीचे आहे. 

पुढे ते म्हणाले, राज्य सरकार दिशाहीन आहे. या सरकारमध्ये निर्णयाची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीतच बसले आहेत. या घडीला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन एक महिना उलटला आहे. आता जर तुम्ही तुमचे वकील सर्वोच्च न्यायालयात पाठवून तुम्ही विनंती करत आहात. मग महिन्याभराच्या कालावधीत राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले गेले नाही का? मराठा समाजातील तरूण-तरूणींना सर्वोच्च न्यायालयात जाऊन व स्थगिती उठून न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित करून पाटील म्हणाले की ,महाविकास आघाडी सरकार असो किंवा मुख्यमंत्री यांनी या परिस्थितीत खरं बोलायला हवे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात महिविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेत येईल यावर  चंद्रकांत पाटील भाष्य करताना म्हणाले, नड्डा यांचे ते सत्तातंराचे भाकीत आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून नसून जेव्हा निवडणुका होतील तेंव्हा साठी आहे.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलRohit Pawarरोहित पवारPoliticsराजकारण