शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मराठा आरक्षण देण्यास सरकारमधील काही जणांचा विरोध; भाजपाचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 15:15 IST

आज  सरकारमध्ये असणाऱ्या काहींचा त्याला तात्विक विरोध आहे. त्यांनी वेळप्रसंगी विरोधकांना सामील करून घ्यावे.

पुणे - मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी असताना राज्य सरकारकडून कोणतीही तयारी केली नाही. आमच्या सरकारच्या काळात मागास आयोगाची निर्मिती न झाल्याने (राणे हे कमिशन नाही, कमिटी आहे)आम्ही मागास आयोगाची निर्मिती केली. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार इतिहासात मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार नोकऱ्या, वैद्यकीय जागांवर आरक्षण दिले गेले. मात्र हे सरकार आरक्षण टिकवण्यासाठी धडपड करत नाही असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. 

याबाबत बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातमराठा आरक्षणाबाबत सुनावणी होती त्यावर सुप्रीम कोर्टाने ४ आठवड्याची मुदतवाढ दिली. याबाबत अंतिम सुनावणी 17 मार्चला आहे, तेव्हा तरी तयारी करावी. आज महाराष्ट्र सरकारने तयारी व्यवस्थित केली नाही. आम्ही उच्च न्यायालायलाची तयारी व्यवस्थित केली होती. नीट तयारी करून केस चालवली तर मराठा समाजाला कायमचे आरक्षण मिळेल असं त्यांनी सांगितले. 

चंद्रकांतदादांची जीभ घसरली; 'काँग्रेसने हळूहळू शर्ट काढला, पॅन्ट काढली आणि आता...'

तसेच आज  सरकारमध्ये असणाऱ्या काहींचा त्याला तात्विक विरोध आहे. त्यांनी वेळप्रसंगी विरोधकांना सामील करून घ्यावे. त्यासाठी शासनाने ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. 

महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली होती. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावेळी उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध असल्याचं सांगत १६ टक्क्यांऐवजी १२ ते १३ टक्के आरक्षण द्यावं असे आदेश दिले. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली. 

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयासाठी राज ठाकरेंकडून अभिनंदन, व्यक्त केली अपेक्षा!

'भारतात आता लोकशाही राहिली आहे का?', प्रियंका गांधींचा संतप्त सवाल

"पंतप्रधान मोदींच्या काळात बँकांमधील 'फ्रॉड'ची संख्या वाढली"

डोंबिवलीतील प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू; मनसे आमदाराचा इशारा

आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होतोय; हिंगणघाट घटनेवर छत्रपती संभाजीराजे संतापले 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार