शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरची तहान २ टीएमसीची, नदीला पाणी सोडले जातेय २० टीएमसी; दुहेरी समांतर पाईपलाईन रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 12:13 IST

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी जलाशयावरून जुनी पाईपलाईन आहे तसेच दुहेरी पाईपलाईनचे काम सुरू आहे...

- सतीश सांगळे

कळस (पुणे) :पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्याला वरदान लाभलेले उजनी धरण उणे ३६ टक्के झाले आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी उजनी धरणातून दरवर्षी २ टीएमसी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात दरवर्षी पिण्यासाठी २० टीएमसी पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. त्यामुळेच दरवर्षी उजनी धरणातील पाणीसाठा उणेमध्ये जात आहे.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी जलाशयावरून जुनी पाईपलाईन आहे तसेच दुहेरी पाईपलाईनचे काम सुरू आहे; मात्र ती जलदगतीने पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. ही योजना प्रत्यक्षात साकार झाल्यास उजनी धरणातील पाण्याची मोठी बचत होणार आहे. दरवर्षी मायनसमध्ये जाणारा उजनी धरणातील पाणीसाठा ‘प्लस’मध्ये राहील. पाईपलाईनचे काम लवकर पूर्ण झाल्यास तब्बल २० टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.

सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहराला तीन स्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. उजनी जलाशयातून ०.९ टीएमसी, भीमा नदीतून ०.७१ टीएमसी आणि एकरूख मध्यम प्रकल्पातून ०.१३ टीएमसी याप्रमाणे एकूण १.७४ टीएमसी पाण्याचे आरक्षण आहे.

भीमा नदीवरील पाणी पुरवठा योजनेसाठी पंपगृह टाकळी येथे आहे. हे पंपगृह भीमा नदीवरील औज व चिंचपूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्यामधील भागात आहे. औज कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची साठवणक्षमता २०५.६९ दलघफू व चिंचपूर बंधाऱ्याची साठवण क्षमता २०८.५३ दलघफू इतकी आहे. या दोन्ही बंधाऱ्यांची एकत्रित साठवणक्षमता ४१२.२२ दलघफू (०.४१ टीएमसी) आहे. उजनी धरण ते औज बंधारा हे अंतर २३२ किलोमीटर व चिंचपूर बंधारा हे अंतर २४० किलोमीटर इतके आहे. त्यामुळे दोन टीएमसी पाण्यासाठी एकावेळी ६ टीएमसी पाणी सोडण्यात येते. वर्षभरात तीनवेळा पाणी सोडण्यात येते. यामधून २० ते २२ टीएमसी पाणी सोडले जाते.

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुहेरी समांतर पाईपलाईन योजना जलदगतीने पूर्णत्वास गेल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल. धरणातून नदीत पाणी सोडून एका वेळेस औज व चिंचपूर बंधारे भरून देण्यासाठी सुमारे सहा टीएमसी म्हणजे या बंधाऱ्यांच्या साठवण क्षमतेच्या अंदाजे १० पट पाणी उजनी धरणातून सोडावे लागत आहे.

उजनी प्रकल्पाच्या मंजूर प्रकल्प अहवालात उजनी धरणातून भीमा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याची तरतूद नाही. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम प्राधान्य असल्यामुळे दरवर्षी धरणातून सुमारे २० ते २२ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यासाठी उजनी धरणातून आकस्मिक आरक्षण करण्यात येते.

पाणी आरक्षण

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची सोलापूर शहर पाणीपुरवठा वाढीव योजनेसाठी पिण्यासाठी ६९.६५ द.ल.घ.मी. व औद्योगिक वापरासाठी १२.९२ द.ल.घ.मी. असे एकूण ८२.५६ द.ल.घ.मी. (२.९१ टीएमसी / २२२ एमएलडी) (बाष्पीभवन) व्ययासह पाणी आरक्षणास मान्यता आहे.

भीषण पाणीटंचाई

यंदाच्या पावसाळ्यात ६० टक्के भरलेले उजनी धरण सध्या उणे ३६ टक्क्यांपर्यंत गेले असून धरणात सध्या मृतसाठ्यातील ४४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पण, त्यात अंदाजे १८ टीएमसी गाळ असून राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्बंधानुसार पूर्ण पाणी उपसा करता येत नाही. दुसरीकडे उजनी धरणावर अनेक गावांसह शहरांचा व एमआयडीसींचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई मोठी भासणार आहे

पिण्यासाठी नदीपात्रात साडेसहा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणातून नदीत १५०० क्युसेकने विसर्ग चालूच आहे. आगामी काळात परिस्थिती पाहून निर्णय होईल. सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी समांतर पाईपलाईनचे काम चालू आहे; मात्र याबाबत महापालिका स्तरावर तपशीलवार माहिती आहे.

- रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता उजनी धरण

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरDamधरण