शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भेडणीकरांच्या घशाला उन्हाळ्याआधीच कोरड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:29 IST

राज्यातील सर्वांत मोठे उजनी धरण तालुक्यात असतानाही त्याच इंदापूर तालुक्यातील भेडणी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या आधीच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

काटी : राज्यातील सर्वांत मोठे उजनी धरण तालुक्यात असतानाही त्याच इंदापूर तालुक्यातील भेडणी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या आधीच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावाचा जलस्रोत असणारी विहीर कोरडी पडल्याने भेडणीकरांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या शेटफळ तलावाचे पाणी गावातील विहिरीत सोडावे, अशी मागणी सरपंच अनिल चव्हाण यांनी केली.भेडणीमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना लांबपर्यंत पायपीट करावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी गावातील पंपहाऊसवर महिलांना, तसेच नागरिकांना रांगेत उभे राहून उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.अनेक बाया-बापड्या पंपहाऊसपासून घरापर्यंत डोक्यावर व कंबरेवर हंडा घेऊन हेलपाटे मारत आहेत, तर ज्यांचे कुटुंब मोठे आहे, त्या घरातील गडीमाणसेही इतर व्यवसाय सोडून मोटारसायकलवर ड्रम लावून पंपहाऊसला पाण्यासाठी हेलपाटे मारत आहेत.उन्हाळा संपायच्याआधीच गावातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे उन्हाळ््यामध्ये या गावातील पाणीटंचाई गंभीर होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे....तत्काळ उपाययोजना करणारभेडणी गावांचा पाणी सोडण्यासंदर्भात प्रस्ताव दाखल झाला आहे. शेटफळ हवेलीचे गावकामगार तलाठी यांना सध्याच्या परिस्थितीची पाहणी करून अहवाल तत्काळ कार्यालयात सादर करण्याचा आदेश दिला आहे. भेडणी गावातील नागरिकांचे हाल होऊ देणार नाहीत. त्यांच्यासाठी तत्काळ उपाययोजना करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.उन्हाळ््यातील भीषण टंचाई लक्षात घेता त्या वेळी पाणीपुरवठा कुठून करावा, याबाबतचे नियोजन आताच करावे, शिवाय तूर्तास गावामध्ये टँकर सुरू करावा, अशी मागणी सरपंच चव्हाण यांनी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे