शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आंजर्ले येथील समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील सहा पर्यटक बुडाले; तिघांना वाचवण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 17:10 IST

पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण पर्यटक पाण्यात बुडाले.

पुणे : पुण्यातील औंध येथून १४ पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गेले होते. शुक्रवारी(दि. १८)  हे पर्यटक दुपारच्यास सुमारास आंजर्ले येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण पर्यटक पाण्यात बुडाले.त्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून स्थानिकांच्या मदतीने तिघांना वाचवण्यात यश आले आहे. 

 

पुण्यातील औंध येथून दापोली तालुक्यातील आंजर्लेला एका कंपनीतील 14 तरूण मुले शुक्रवारी (18 डिसेंबर) गेली होती. त्यातील सहा जण सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहोण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली.  त्यातील तीन तरूणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, स्थानिक युवकांच्या मदतीने तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. पर्यटनसाठी आलेल्या आपल्या मित्रांवर काळाने घाला घातल्याने त्यांच्या मित्रांना धक्का बसला आहे. मृत पावलेल्या तरूणांच्या कुटुंंबांवरही शोककळा पसरली आहे.

अक्षय राखलेकर (वय 25), विक्रम श्रीवास्तव (वय 24), मनोज गावंडे (वय 24) अशी मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर रोहित पलांडे, उबेद खान आणि निहाल चव्हाण यांना वाचविण्यात यश मिळाले आहे. त्यांच्यावर आंजर्लेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

एका कंपनीत काम करणारी 14 तरूण मुले शुक्रवारी ( 18 डिसेंबर) पर्यटनासाठी आंजर्ले (ता.दापोली) येथे गेली होती. त्यातील सहा तरूणांना समुद्रामध्ये जाण्याचा मोह झाला आणि ते समुद्रात उतरले. मात्र पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते बुडायला लागले. तिथल्या एका छोट्या  मुलाने ते पाहिले आणि त्याने धावत जाऊन स्थानिक युवकांना माहिती दिली. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक युवकांनी मोठ्या शर्थीने या सहा तरूणांना बाहेर काढले. पण दुर्देवाने त्यातील तीन तरूण हे बुडाले.--------------------------------------------------------------------------------

टॅग्स :Dapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणेDeathमृत्यूtourismपर्यटनRatnagiriरत्नागिरीAundhऔंध