शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वाजणारे सायरन, धडकी भरवणारे बॉम्बहल्ले...., युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 22:35 IST

जीव मुठीत घेतला आहे, पण मनात सुरक्षितपणे मायदेश गाठणे हीच इच्छा आहे

प्रसाद कानडे

पुणे : दिवस -रात्र आम्ही शेल्टरचा आसरा घेतलाय. वाजणारे सायरन, उरात धडकी भरविणारे बॉम्बहल्ले आणि आजूबाजूला दिसणारा रक्तपात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. सततच्या बॉम्ब वर्षावात आपण सुरक्षित आहोत हिच येथील प्रत्येकाची भावना निर्माण आहे.कोणी मेट्रोच्या स्टेशनचा आसरा घेतलाय तर कुणी कॉलेजच्या हॉस्टेलवर स्वतःला अक्षरश कोंडून घेतल आहे. जीव मुठीत घेतला आहे, पण मनात सुरक्षितपणे मायदेश गाठणे हीच इच्छा आहे. शिवानी लोणकर सारख्या हजारो भारतीय युक्रेन मध्ये अडकून पडलेत.आपल्या सुरक्षेसाठी भारत सरकारला साद घातलीय.

पुण्याची शिवानी लोणकर युक्रेन ची राजधानी असलेल्या किव्ह मध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. शिवानी म्हणाली, काही दिवसांपूर्वी युक्रेन ची परिस्थिती खूप चांगली होती. मात्र रशियाने दोन दिवसांपासून युद्धाची घोषणा केल्यानंतर परिस्थिती खूप बिघडली आहे. युक्रेनची परिस्थिती शिवानी सांगतेय. सध्याची स्थिती आणीबाणीची आहे. स्थानिक प्रशासन कोणतीच मदत करीत नाही. सायरन वाजताच शेल्टर मध्ये जाण्याच्या सूचना केल्या आहेत. पण शेल्टर मधील परिस्थिती भीषण आहे. पिण्यास देखील पाणी नाही. आम्ही खूप सारे लोक दाटीवाटीने येथे बसलो आहोत. काही भारतीय विद्यार्थी आपआपल्या महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये राहिल्या आहेत. मी ज्या इमारती मध्ये राहते तेथे तळघरात जाऊन राहत आहे. भारतीय दुतावासाशी संपर्क होईना.

सर्व बाजुंनी सीमारेषांजवळ पोहचणे अवघड

आम्हाला भारतात यायचेच. पण बॉम्ब हल्यामुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. पोलंड मार्गे भारतात येण्यासाठी प्रयत्न करतोय. पण सर्व बाजूनी सीमारेषांजवळ पोहचणे अवघड झाले आहे. पोलंडच्या सीमेवर कसं हे देखील माहित नाही. स्थानिक प्रशासन देखील या विषयी काही माहिती देत नाही. भारतीय दूतावासशी संपर्क देखील होत नाही. काय करावे हेच आता सुचत नाही. घरी संपर्क होतो. पण पुन्हा संपर्क होईल की नाही याची देखील खात्री नसल्याची भावना शिवानी ने मांडली.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाIndiaभारतStudentविद्यार्थीwarयुद्ध