शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

" साहेब आता किती बी पाऊस पडू द्या, घाबरत नाही ;कारण नुकसान होण्याजोगे काही उरलंच नाही..!" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 21:49 IST

विलास कुंजीर यांच्या मालकीच्या चौदा एकरामधील ऊस, कांदा, बाजरी, मका, भुईमूग अशी विविध पिके रविवारी झालेल्या पावसामुळे वाहुन गेली आहेत.. .  

ठळक मुद्देजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पावसाने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

सुनील जगताप -

उरुळी कांचन : वळती , शिंदवणे, तरडे व उरुळी कांचन या गावातील नागरिक व व्यावसायिक यांच्यासह कालच्या ढगफुटीचा सगळ्यात जास्त फटका बसला तो बळीराजाला.. त्याच धर्तीवर पावसामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना माहिती देताना साठ वर्षीय शेतकरी विलास रामचंद्र कुंजीर म्हणाले, '' साहेब आता किती बी पाऊस पडू द्या, अजिबात घाबरत नाही.. कारण या पावसाने नुकसान होण्याजोगे काही शिल्लक ठेवलेच नाही तर घाबरु कशाला?..'' या साठ वर्षीय शेतकऱ्याच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू आणि हा काळजाचा ठाव घेणाऱ्या संवादाने उपस्थित असलेले सारेच जण काहीवेळ गहिवरले.  

विलास कुंजीर यांच्या मालकीच्या चौदा एकरामधील ऊस, कांदा, बाजरी, मका, भुईमूग अशी विविध पिके रविवारी झालेल्या पावसामुळे वाहुन गेली आहेत.  दोन विहिरी मातीने व दगड धोंड्यामुळे बुजल्या आहेत.                  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सोमवारी ( दि. १९) वळती, शिंदवणे, तरडे व उरुळी कांचन या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी ढगफुटीने झालेल्या सर्वप्रकारच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभाग, इरिगेशन विभागांच्या समन्वयातून करून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सात दिवसाच्या आत पाठवावेत असे आदेश देशमुख यांनी दिले.यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर,तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, मंडल अधिकारी दीपक चव्हाण, प्रशासक निकेतन धापटे आदी उपस्थित होते.  

                 देशमुख म्हणाले,  उरुळी कांचनसह पूर्व हवेलीमधील सर्वच ओढ्या - नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले आहे. हे अतिक्रमणे कायमस्वरुपी हटण्यासाठी हवेलीमधील लोकप्रतिनिधी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच बोलविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख सांगितले.               यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले, वळती हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी (ता.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास ढगफुटी पाऊस झाल्याने, वळती परीसरातील हजारो एकर क्षेत्रावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील फळबागा, कांदा, तरकारी, भुईमूग, चारा पिके याचे अतोनात नुकसान झाले आहे. वळती ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आमदार या नात्याने वळती येथील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही आमदार पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनRainपाऊसFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी